मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नानासाहेबांचे कार्य ,श्रमदान ,वसतिगृहातील सुरूवातीचा दिवसात विद्यार्थ्यां सोबत नाना

 
अलीकडील पोस्ट

आश्रमशाळा लोणजेसाठी मा.शिक्षणमहर्षी नानासाहेब य.ना. चव्हाण यांचे योगदन,(श्री.सोनार मुख्याध्यापक हरिभाऊ चव्हाण प्रा.आश्रमशाळा लोणजे ता.चाळीसगाव(जळगाव))

  लोणजे हे गाव चाळीसगाव शहरापासून १५ कि . मी .  , दूरवर डोंगर पायथ्याशी व सर्व सुखसोयी पासून वंचीत होते . यात ९ ५ टक्के मागासवर्गीय बंजारा समाजाची वस्ती . दारिद्रय , अंधश्रद्धा व जुन्या चालीरिती यांनी अंधकारमय झालेल्या या वस्तीस खानदेशचे गांधी हरिभाऊ चव्हाण या महान व्यक्तिच्या रुपाने प्रकाश मिळाला . महात्मा गांधी यांच्या हाकेनुसार खेड्यात जा ! सेवा करा ! या साठी हरिभाऊ चव्हाण स्वत : या ठिकाणी राहून येथील गोरगरीबांची सेवा करीत करीत सामाजिक  कार्याकडे वळले . लहान मोठ्यांना शिक्षणाचे धडे देऊ लागलेत व कोणताही मोबदला न घेता रात्रंदिवस हा जनता जगन्नाथाचा रथ अनेक अनुयायींच्या मदतीने ओढू लागलेत .         त्यांच्यानंतर हे सामाजिक कार्याचे व्रत या गावाचे मा . आबासाहेब श्री . हि . भि . चव्हाण यांच्या रुपाने जोपासले गेले . आबांच्या रुपाने एक मार्गदर्शक हिरा लाभला . त्यांनी अनेक सहकारी बांधवांच्या मदतीने आपल्या समाज बांधवांना अंधश्रद्धा , शिक्षण , सामाजिक परिवर्तन , सुधारीत शेती , आदर्श ग्राम संकल्पना या अनेक बाबतीत प्रयत्नाची पराकाष्टा करून योग्य असे अहोरात्र...

तेथे कर माझे जुळती(श्री.नामदेव ओंकार पवार,चाळीसगाव)

  गु रुर्ब्रह्मा , गुरुर्विष्णु , गुरुर्देवो महेश्वर :  गुरुर्साक्षात् परब्रमह्य , तस्मै श्री गुरवे नमः ।।    आदरणीय श्री . नानासाहेबांबद्दल माझ्या सारख्या पामराने काही लिहिणे , म्हणजे साक्षात सुर्याला दीपक दाखविण्या सारखे होईल . कमरेला धोतर , अंगात खादीचा पांढरा गुरुशर्ट व डोक्यावर गांधी टोपी घातलेले नाना बघितले तर पूज्य सानेगुरुजी अगर  .विनोबाजी भावे यांची आठवण झाली नाही , तरच नवल ! धार्मिकता व वारकरी संप्रदायाचे बाळकडू बाळबोध वयातच नानांना मिळाले ते त्यांच्या घरातूनच . एक रुपया महिन्याने टपाल वाटप करुन प्राथमिक शिक्षण घेणारे नाना , बडोदा येथील समाजी मराठा वसतीगृहात कामकाजकरुन अर्धनादारीची सवलत मिळविणारे नाना , पुण्यात लॉ - कॉलेजच्या वसतीगृहाच्या खानावळीत परिश्रम करुन दोनवेळचे जेवण मिळविणारे नाना , न कळतच जिद्दीचे व स्वावलंबनाचे धडे शिकवून जातात , अशाप्रकारे विद्यार्थी दशेतच हालअपेष्टा सोसलेल्या नानांनी खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत गैरसोयी व गरजांचे ' मर्म ' जाणून चाळीसगाव सारख्या तालुक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी प्रथमत: वसतीगृह सु...

स्काऊट गाईड चळवळीचे स्फूर्ती स्थान नानासाहेब य.ना.चव्हाण(श्री.बी.डी.वाबळे ,सहाय्यक जिल्हा कमिशनर,जळगाव भारत स्काऊट आणि गाईड जि.जळगाव)

  महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड संस्थेच्या  कौन्सिलर पदी माझी निवड झाली असता , माननीय  नानासाहेबांनी एके दिवशी खास मला बोलावून माझी मुलाखत घेतली . ह्या मुलाखतीत स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास , ह्या शिक्षणाची गरज , उद्दिष्ट्ये , महत्त्व जाणून घेतले . ह्या संबंधित असलेली पुस्तके माझे जवळून मागून जिज्ञासापूर्वक वाचलीत . राष्ट्राला , समाजाला आदर्श , सुसंस्कृत , शिस्तबद्ध , निष्ठावान नागरिक व नेतृत्व देणारी ही चळवळ अतिशय मोलाची आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले . काळाची गरज विचारात घेता राज्यातही चळवळ उत्तम प्रकारे कशी राबविली जाईल असे प्रयत्न करा , असे त्यांनी आवाहन केले .   स्वावलंबन व श्रमदान यावर नानासाहेबांची मोलाची श्रद्धा . संस्थेच्या शांखावरील स्काऊट गाईडचे मेळावे व कॅम्पमध्ये नानासाहेब श्रमदानात व वृक्षारोपणात सातत्याने सहभागी असतात . १ ९ ८४ साली महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड या संस्थेने चाळीसगाव येथे ५ दिवसांचा चार जिल्ह्यांचा नासिक विभागीय मेळावा आयोजीत केला होता.मेळाव्याचे उद् -घाटक     नानासाहेब य.ना. चव्हाणच होते.सदर मेळाव्यात तीन हजार मुला...

मा.श्री.रा.रा.यशवंतराव उर्फ नानासाहेब चव्हाण अमृत महोत्सव(डाॅ.श्यामकांत देव,चाळीसगाव)

  मी चाळीसगावांत चाळीस वर्षांपूवी , जेव्हा प्रथम पाऊल ठेवले तेव्हा दोन प्रमुख संस्थांची मला माहिती  देण्यात आली . एक म्हणजे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी व दुसरी म्हणजे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ , पहिल्या संस्थेचे प्रमुख होते मा . श्री . दादासाहेब पाटसकर , त्यांचा व माझा परिचय झाला होता . त्याकाळी त्यांचे राजकारणात नाव गाजत होते .       दुसऱ्या संस्थेचे प्रमुख होते श्री . मा . यशवंतराव उर्फ नानासाहेब चव्हाण , त्यांचेही नाव अनेकांच्या बोलण्यात नेहमी  यावयाचे . परंतु त्यांचा व माझा अजून परिचय झालेला नव्हता . श्री . नानासाहेबांनी लहान लहान खेड्यातून शाळा काढलेल्या आहेत . मुलांमध्ये - चाळीसगाव तालुक्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून ते प्रयत्न करत आहेत . मागासलेल्या व गरीब मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांना फार कळकळ आहे . अशा मुलांना चाळीसगावात राहता यावे म्हणून त्यांनी  एक वसतीगृह पण सुरु केले आहे . अशा प्रकारची विविध माहिती मला नेहमी मिळत असे . त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य डोळ्यापुढे ठेवून ते कार्यरत आहेत . हे माझ्या लक्षात आले . ह...

धैर्याचा महामेरू (प्रा.म.सु.खैरनार,चाळीसगाव)

  रामजणगावच्या गढी शेजारी माती - शेणानं सारवलेल्या भिंती असलेलं अत्यंत स्वच्छ , चौसोपी , प्रशस्त घर , ओसरीच्या खुंटीवर टांगलेले टाळ , पाटावर ठेवलेली ज्ञानेश्वरी व बाजूला असलेली वीणा . डोईवर भरदार पागोटे , प्रसन्न चेहरा , निरागस डोळे , झुबकेदार मिशांतून खुललेली पारमार्थिक चर्चा . , ज्ञानदेव , तुकारामांच्या ओवी - अभंगातून शेत - मळयाचे भान विसरलेले दादा आणि आल्या - गेलेल्यांची आस्थेने वास्त - पुस्त करुन त्यांच्या आतिथ्यात कमी पडू नये म्हणून स्वत : ला पुरते विसरलेल्या नानांच्या मातोश्री . ' प्रपंची असावे । असोनि नसावे । ' अशा वारकरी कुटुंबातून नानांची जडण - घडण झाली . सावकारी , जमीनदारी गाव . दादा आणि आजींनी स्वत : तालेवार नसूनही आल्या - गेलेल्यांची निकङ पुरी करावी , भाकरीतला घास - तुकडा देऊन भुकेल्यांची भूक भागवावी . प्रेमानं विचारपूस करावी . देता येईल तेवढं देत रहावं , लहान - मोठयांचं कोड कौतुक करावं , मायेच्या चार शद्वांनी गावातील सायऱ्यांवर , कारु - नारूंवर , बलुतेदारांवर , सालदारांवर , त्यांच्या लेकी - बाळींवर , पै - पाहुण्यांवर प्रेमाचा वर्षाव करावा असं हे मोठया मनाचं . दिलदा...