मुख्य सामग्रीवर वगळा

स्काऊट गाईड चळवळीचे स्फूर्ती स्थान नानासाहेब य.ना.चव्हाण(श्री.बी.डी.वाबळे ,सहाय्यक जिल्हा कमिशनर,जळगाव भारत स्काऊट आणि गाईड जि.जळगाव)

 

महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड संस्थेच्या  कौन्सिलर पदी माझी निवड झाली असता , माननीय  नानासाहेबांनी एके दिवशी खास मला बोलावून माझी मुलाखत घेतली . ह्या मुलाखतीत स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास , ह्या शिक्षणाची गरज , उद्दिष्ट्ये , महत्त्व जाणून घेतले . ह्या संबंधित असलेली पुस्तके माझे जवळून मागून जिज्ञासापूर्वक वाचलीत . राष्ट्राला , समाजाला आदर्श , सुसंस्कृत , शिस्तबद्ध , निष्ठावान नागरिक व नेतृत्व देणारी ही चळवळ अतिशय मोलाची आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले . काळाची गरज विचारात घेता राज्यातही चळवळ उत्तम प्रकारे कशी राबविली जाईल असे प्रयत्न करा , असे त्यांनी आवाहन केले .
  स्वावलंबन व श्रमदान यावर नानासाहेबांची मोलाची श्रद्धा . संस्थेच्या शांखावरील स्काऊट गाईडचे मेळावे व कॅम्पमध्ये नानासाहेब श्रमदानात व वृक्षारोपणात सातत्याने सहभागी असतात . १ ९ ८४ साली महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड या संस्थेने चाळीसगाव येथे ५ दिवसांचा चार जिल्ह्यांचा नासिक विभागीय मेळावा आयोजीत केला होता.मेळाव्याचे उद् -घाटक     नानासाहेब य.ना. चव्हाणच होते.सदर मेळाव्यात तीन हजार मुलांसाठी तीनशे तंबूची उभारणी करून भास्कराचार्य नगर तयार केले होते .निवास व्यवस्थेत व रचनेत नानासाहेबांनी मोलाचे परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले.  मेळावा सचिव म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यात नानासाहेबांचे मोलाचे श्रेय होय . यामुळे आपल्या संस्थेला प्रतिष्ठा लाभली . राज्य निरिक्षकांनी संस्थेचा गौरव केला . स्टेट चिफ कमिशनर माननीय श्री . व्यंकटराव रणधीर व कर्नाटकचे स्टेट चीफ कमिशनर यांनी राष्ट्रीय विद्यालयाला भेट दिली . संस्थेतील स्काऊट चळवळीचे कामकाज पाहून त्यांनी मन : पूर्वक समाधान व्यक्त केले .
    दर तीन वर्षांनी होणारे चाळीसगाव तालुक्याचे स्काऊट गाईड मेळावे नानासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार होत आहेत . नियोजित चाळीसगाव स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीत नानासाहेबांनी मोलाचे योगदान देऊ केले आहे . जागेचा विकास आणि कब , बुलबुल , स्काऊट गाईड , मुला मुलींसाठी आपण काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिलेले आहे .       नानासाहेब हे स्काऊट गाईड चळवळीतील पदाधिकारी जरी नसले तरी ते मोलाचे कृतीने , मनाने , जागरुकतेने व नीतिने पवित्र राहून या चळवळीचे स्फूर्ती व प्रेरणास्थान आहेत . स्काऊटचे ब्रीद ' तयार रहा ' यासाठी शरिराने सुदृढ , मनाने जागरुक व नीतिने पवित्र राहून इतरांच्या सदैव उपयोगी पडण्यासाठी तयार राहण्याचा स्काऊट प्रयत्न करतो .     नानासाहेबांच्या कार्यातून , प्रेरणेतून , सहवासातून अनेक     स्काऊट गाईड न कळत घडले , बनले . स्काऊटची व्याख्या म्हणजे जो विश्वसनीय असतो , धोका व संकटे यांना न जुमानता जो आपले कर्तव्य न चुकता , न कचरता पार पाडतो आणि कितीही अडचणी आल्या तरी देखिल तो आनंदी व उत्साही वृत्ती कायम ठेवतो तो खरा स्काऊट होय . 
    स्काऊट गाईड संघटनेचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी जगातील स्काऊटस , गाईडसना मरणापूर्वी निरोपाचे चार शब्द सांगितले आहेत . त्यात ते म्हणतात , कोणत्याही घटनेकडे उदासिन वृत्तीने व निराशेने पाहू नका . उल्हासपूर्वक व आशादायक दृष्टीने इतरांना सुखी करणे हाच समाधान मिळविण्याचा खरा मार्ग आहे . या जगात तूम्ही पाऊल ठेवलेत त्या पेक्षा जातांना हे जग थोडे तरी अधिक बरे करण्याचा प्रयत्न करा . म्हणजे जेव्हा मरणाची वेळ येईल त्यावेळी आपण आपले आयुष्य व्यर्थ घालविले नाही . आपण आपल्याकडून शिकस्त केली आहे असे समाधान तुम्हास मिळेल . या प्रमाणे आनंदात जगण्याकरीता आणि आनंदाने मरणाकरीता ' तयार रहा ' . या आपल्या स्काऊट वचनाची आठवण ठेवा . तुमचे  बालपण संपल्यानंतरही स्काऊट वचनांचे पालन करा . देव तुम्हास या प्रयत्नात यश देवो . असा निरोप त्यांनी दिला . 
नानासाहेबांच्या ७५ वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या सहवासात जे लहान थोर आलेत , ते प्रेरणा व स्फूर्ती घेऊन गेलेत . त्यांचे जीवन सुखी व समृद्ध झाले . नानांच्या ध्येयातून व कृतीतून मोलाच्या संस्कारांचा व शिक्षणाचा प्रसार झाला . त्यांच्या त्यागाचा , सेवेचा आदर करुन , स्काऊट गाईड संघटनेच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो . ईश्वरकृपेने त्यांना शतायुष्य लाभून त्यांची स्फूर्ती , प्रेरणा , आदर्श व मार्गदर्शन सातत्याने लाभत राहो ही अमृतमहोत्सवी शुभेच्छा व्यक्त करतो . ' जय हिंद ' !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...