मुख्य सामग्रीवर वगळा

शिक्षण - महर्षि- श्री.नानासाहेब चव्हाण(श्री.गोविंदराव शिंदे,प्रमुख कार्यवाहक,अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला शांतीवन ,पुणे)


  चाळीसगावचे शिक्षण महर्षी श्री. नानासाहेब चव्हाण  यांचा ७५ वा वाढदिवस अमृतमहोत्सव 7 जानेवारी १ ९९ ८ रोजी त्याच्या जन्मगावी चाळीसगावला साजरा होत आहे .है ऐकून खूप आनंद झाला . चाळीसगाव है जळगाव जिल्हातील एक प्रमुख शहर आहे . तेथे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही  संस्था नानासाहेबांनी स्थापन केली . त्या संस्थेचे चेअरमन म्हणून आज ते काम पहात आहेत , सर्वस्व झोकून देणारे खंबीर नेतृत्व संस्थेला मिळालं आहे . त्यामुळे संस्थेची गेल्या ४८ वार्षात केवढीतरी भरभराट झाली आहे . या संस्थेचे आज एका प्रचंड वटवृक्षांमध्ये रुपांतर झालेले आहे . विद्यादान हे सर्वश्रेष्ठदान आहे . तळागाळातील खेड्यात वास्तव्य करत असलेल्या सामान्य विद्याथ्याला शिक्षण सहजपणे मिळेल यादृष्टीने संस्थेने सर्वत्र शाळा सुरु केल्या आहेत , शाळेची भकम इमारत , सुसज्ज प्रयोगशाळा , विपुल ग्रंथ संख्या , समृद्ध ग्रंथालय. या सर्व शाळांतून हजारो विद्यार्थी शिकून मोठमोठ्या थोत्रात काम करत आहेत . 

   श्री . नानासाहेबांनी शिक्षणाचे काम एकांगीपणे केले नाही , त्यासाठी जनशक्ती उभी केली . त्यामुळे एवढे प्रचंड काम ते व त्यांचे सहकारी उभे करु शकले . शिक्षणामध्ये मुलांना नैतिक शिक्षण मिळेल यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरु केले . मुलांवर लहानपणी चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी आपल्या शाळांमधून साने गुरुजी कथामालेचे काम प्रभावीपणे वाढवले . त्यामुळे त्यांच्या संस्थेला यंदाचा सानेगुरुजी बालसेवा पुरस्कार मिळाला आहे . गोष्ट ही परिणामाने , प्रभावाने व सामर्थ्या ने महान आहे . गोष्टीचे हे सामर्थ्य श्री . नानासाहेब चव्हाणांनी जाणलं व वाढवलं .

       शिक्षणाच्या कार्याबरोबर त्यांनी सामाजिक काम व्यापक प्रमाणावर केले . प्रथम माझी त्यांची भेट आचार्य विनोबाजींनी सुरु केलेल्या भूदान यज्ञ आंदोलनाच्या निमित्ताने झाली . त्यावेळी सर्वत्र जाऊन सामुहिक पदयात्रा काढून खेड्यापाड्यात हिंडत असू १ ९ ६० साल असावं . जळगाव जिल्ह्यातील या कामाचे एक शिबीर चाळीसगावला झालं . शंभरावर कार्यकर्ते आम्ही जमलो होतो . त्यावेळची आमची ती सामुहिक पदयात्रा अत्यंत यशस्वी झाली . स्वत : मागे राहून काम कसं यशस्वी करायचं हे त्यावेळी आम्हा मंडळींना शिकायला मिळालं . अ . भा . साने गुरुजी कथामालेत त्यांच्या सोबत अनेक वर्षे काम करत आहे . फार बोलायचे नाहीत . बोलतील ते ठाम व निर्णायक असेल . त्यांच्यांशी कुणाच कधी भांडण झाल्याचं मी पाहिलं नाही ते कधी कुणावर रागावलेलेही दिसले नाहीत . आपलं काम चोख करण्याची त्यांची वृत्ती . स्वत : सर्व लक्ष घालून करणार , समाजातला जो शेवटचा आहे त्याच्याकडे त्यांचे लक्ष असते . त्यामुळेच गरीब पददलीत मुलांसाठी त्यांनी फार मोठे काम केले आहे . आम्ही धुळे जिल्ह्यात सातपुड्यात धडगाव भागात अगदी जंगलात आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे काम करतो . नानासाहेबांनी ते एकदा पहाव म्हणून त्यांना तिकडे एका कार्यक्रमाचे निमित्ताने घेऊन गेलो . जंगल भागातल्या आमच्या शाळा पाहून नानासाहेबांना खूप आनंद झाला . त्यावेळी त्यांची विद्यार्थ्यासाठी जी उत्स्फूर्त भाषणे झाली ती त्या आदिवासी मुलांना प्रेरणादायक ठरली . करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभुशी त्याचे असे नानासाहेबांचे अद्भूत जीवन आहे . त्यांचे जीवन असेच मुलांसाठी कार्यरत राहो व त्यांना निरोगी भरपूर आयूष्य लाभो ही प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...