शिक्षण - महर्षि- श्री.नानासाहेब चव्हाण(श्री.गोविंदराव शिंदे,प्रमुख कार्यवाहक,अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला शांतीवन ,पुणे)
चाळीसगावचे शिक्षण महर्षी श्री. नानासाहेब चव्हाण यांचा ७५ वा वाढदिवस अमृतमहोत्सव 7 जानेवारी १ ९९ ८ रोजी त्याच्या जन्मगावी चाळीसगावला साजरा होत आहे .है ऐकून खूप आनंद झाला . चाळीसगाव है जळगाव जिल्हातील एक प्रमुख शहर आहे . तेथे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था नानासाहेबांनी स्थापन केली . त्या संस्थेचे चेअरमन म्हणून आज ते काम पहात आहेत , सर्वस्व झोकून देणारे खंबीर नेतृत्व संस्थेला मिळालं आहे . त्यामुळे संस्थेची गेल्या ४८ वार्षात केवढीतरी भरभराट झाली आहे . या संस्थेचे आज एका प्रचंड वटवृक्षांमध्ये रुपांतर झालेले आहे . विद्यादान हे सर्वश्रेष्ठदान आहे . तळागाळातील खेड्यात वास्तव्य करत असलेल्या सामान्य विद्याथ्याला शिक्षण सहजपणे मिळेल यादृष्टीने संस्थेने सर्वत्र शाळा सुरु केल्या आहेत , शाळेची भकम इमारत , सुसज्ज प्रयोगशाळा , विपुल ग्रंथ संख्या , समृद्ध ग्रंथालय. या सर्व शाळांतून हजारो विद्यार्थी शिकून मोठमोठ्या थोत्रात काम करत आहेत .
श्री . नानासाहेबांनी शिक्षणाचे काम एकांगीपणे केले नाही , त्यासाठी जनशक्ती उभी केली . त्यामुळे एवढे प्रचंड काम ते व त्यांचे सहकारी उभे करु शकले . शिक्षणामध्ये मुलांना नैतिक शिक्षण मिळेल यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरु केले . मुलांवर लहानपणी चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी आपल्या शाळांमधून साने गुरुजी कथामालेचे काम प्रभावीपणे वाढवले . त्यामुळे त्यांच्या संस्थेला यंदाचा सानेगुरुजी बालसेवा पुरस्कार मिळाला आहे . गोष्ट ही परिणामाने , प्रभावाने व सामर्थ्या ने महान आहे . गोष्टीचे हे सामर्थ्य श्री . नानासाहेब चव्हाणांनी जाणलं व वाढवलं .
शिक्षणाच्या कार्याबरोबर त्यांनी सामाजिक काम व्यापक प्रमाणावर केले . प्रथम माझी त्यांची भेट आचार्य विनोबाजींनी सुरु केलेल्या भूदान यज्ञ आंदोलनाच्या निमित्ताने झाली . त्यावेळी सर्वत्र जाऊन सामुहिक पदयात्रा काढून खेड्यापाड्यात हिंडत असू १ ९ ६० साल असावं . जळगाव जिल्ह्यातील या कामाचे एक शिबीर चाळीसगावला झालं . शंभरावर कार्यकर्ते आम्ही जमलो होतो . त्यावेळची आमची ती सामुहिक पदयात्रा अत्यंत यशस्वी झाली . स्वत : मागे राहून काम कसं यशस्वी करायचं हे त्यावेळी आम्हा मंडळींना शिकायला मिळालं . अ . भा . साने गुरुजी कथामालेत त्यांच्या सोबत अनेक वर्षे काम करत आहे . फार बोलायचे नाहीत . बोलतील ते ठाम व निर्णायक असेल . त्यांच्यांशी कुणाच कधी भांडण झाल्याचं मी पाहिलं नाही ते कधी कुणावर रागावलेलेही दिसले नाहीत . आपलं काम चोख करण्याची त्यांची वृत्ती . स्वत : सर्व लक्ष घालून करणार , समाजातला जो शेवटचा आहे त्याच्याकडे त्यांचे लक्ष असते . त्यामुळेच गरीब पददलीत मुलांसाठी त्यांनी फार मोठे काम केले आहे . आम्ही धुळे जिल्ह्यात सातपुड्यात धडगाव भागात अगदी जंगलात आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे काम करतो . नानासाहेबांनी ते एकदा पहाव म्हणून त्यांना तिकडे एका कार्यक्रमाचे निमित्ताने घेऊन गेलो . जंगल भागातल्या आमच्या शाळा पाहून नानासाहेबांना खूप आनंद झाला . त्यावेळी त्यांची विद्यार्थ्यासाठी जी उत्स्फूर्त भाषणे झाली ती त्या आदिवासी मुलांना प्रेरणादायक ठरली . करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभुशी त्याचे असे नानासाहेबांचे अद्भूत जीवन आहे . त्यांचे जीवन असेच मुलांसाठी कार्यरत राहो व त्यांना निरोगी भरपूर आयूष्य लाभो ही प्रार्थना .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा