मुख्य सामग्रीवर वगळा

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

 

माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण , 
      सा.न.वि.वि.
  आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो आहोत . तुम्ही खऱ्या अर्थाने विपत्तींचे संधीत रूपांतर केलेत . कोसळणारी संकटे अंगावर झेललीत तुम्ही भोवतालातील आपल्या स्थितीतील माणसांचे भान ठेवलेत . मला तर वाटते तुमच्या समृध्द जीवनाची नाळ अशी  दुःखितांशीच बांधून घेतली आणि त्यांना बळ देता देताच स्वत : ही समर्थ झालात .
   हे आता आमच्या पिढीला जमेल का ? स्वतःच्या अश्रूं नाही आम्ही प्रामाणिक राहू शकत नाही अशी भयावह आत्मघातकी वृत्ती तरारून उठत असतांना आम्हाला तुम्ही ' थोर ' न वाटला तरच आश्चर्य.
     तुम्ही फार भाग्यवान ठरलात . तुम्हाला आदर्श लाभलेत आयुष्यांच्या बिकट वळणांवर आणि त्या थोर पुरूषांच्या पावलांची धूळ तुम्ही मस्तकी लावून आयुष्याचे प्रस्थान ठेवले . तुमची श्रध्दास्थाने कदाचित् म.गांधी असतील , पू साने गुरुजी असतील . पू.विनोबांच्या जीवनदायी अध्यात्माचा खोल ठसा तुमच्या आयुष्यावर कोरला गेला असेल . तुमच्या अस्तित्वाने आम्ही किमान या थोर पुरुषांकडे आदराने अजून आठवणीतून पाहू शकतो . हे काय कमी ऋण आहे तुमचे ? 
   ' श्रद्धा ' शब्दाने खुप गोंधळात पडायला हवे अशा या दिवसात , या शब्दाचे निखळ रुप तुम्ही तुमच्या आचरणाने आम्हाला देऊ केलेत . माणूसकीच्या धर्माची जपणूक तुम्ही उभ्या केलेल्या कामाच्या डोंगरातून डोकावत राहील . ' भावी पिढीच्या काळजीने आम्ही गळे काढू बरेच काही शब्दातून सांडत असतो , त्यावेळी नकळत तुम्ही आठवलात की आमच्या बेगडीपणाने आमचे पितळ उघडे पडल्याचे स्वच्छ दिसू लागते . तुम्ही असे काही व्यक्त करण्यासाठी शब्दाचे माध्यमवापरतच नाही . तुम्ही शब्दांची किंमत जाणता म्हणून  ते उगाच उधळू देत नाहीत . उद्याची पिढीची काळजी घेण्याची तुमची रीत आता सगळ्या जगापुढे उभीच आहे . नुसत्या इमारतीच्या रुपाने नव्हे , तर त्यातून संस्कार घेणाऱ्या असंख्य पिढ्यांच्या रुपाने .
   तुमची प्रथमच भेट केव्हा झाली ते आठवत नाही . पण बहुधा कथामालेच्या शिबिरात ती झाल्याचे आठवते : आणि तुम्ही आमच्यासारख्या पराकोटीच्या बहिर्मुख वृत्तीच्या माणसांच्या डोळ्यात कसे मावणार ? कारण तुम्ही , सगळा भार आपल्या शिरावर असल्याच्या , ओझ्याने वाकून गेलेल्या चेहऱ्यात कधी विसरलाच नाही . व्यासपीठावरुन दिग्गजाची वाणी दुथडी वहात असतांना कधी व्यासपीठावर आलाच नाही . शिस्तीचे बाळकडू देतानाही कधी करडेपणा दाखविण्याचा प्रयत्न केलाच नाहीत , लगबग तुम्ही कधी केली नाही . आणि असे काहीन करणाऱ्यांना आमच्या कोणात प्रतिष्ठा देण्याची आम्हालाही सवय नसल्याने तुमच्याकडे लक्ष द्यायला  उशीरच झाला . पण पुष्कळ गोष्टी समजून आल्या . पर्वतप्राय कार्य उभे करतांनाही मौन मोलाचे असते . खऱ्या अर्थाने लक्षवेधी असते . 
   तुम्ही उभ्या तालुक्याला शिक्षणमय करुन सोडायचा वसा घेतलात . हा वसा घेतलात त्याकाळात तुमचे आदर्श होते बहुधा कर्मवीर भाऊरावासारखी उत्तुंग माणसे ! ऋषीच ते . शिक्षणमहर्षी म्हणून महाराष्ट्र अशा व्यक्तिंना ओळखत असेल आणि त्यांनाही धन्य वाटत असावे या उपाधीने . तुमच्यासाठी सुद्धा हे ' शिक्षणमहर्षी ' बिरूद वापरायला आजच्या काळात तुम्ही बहुधा एकमेव असे याभागात असतांनाही आमची जीभ हा शब्द तुमच्यासाठी उच्चारायला कचरते , इतक्या भीषण वास्तवावर आम्ही हा शब्द 

  आणून ठेवला आहे . हाच काय , कितीतरी शब्दांना आम्ही बघता बघता गेल्या अर्धशतकात पार नासवून ठेवले आहे . सुदैवाने तुमच्या सारख्या व्यक्तिंचे कोठल्याच गौरवी शब्दांकडे लक्ष नसते . त्यामुळे त्याचा त्रास फक्त आम्हाला होतो . प्रत्यक्षात काहीही न करण्यान्यांना आता तुमच्या कर्तृत्वाला पर्यायी शब्द शोधण्याऐवजी फक्त ' नानासाहेबच पुरेसा वाटणे , याला बराच अर्थ आहे . 

   खरेतर शिक्षणसंस्था चालकांच्या नव्या पिढीशी तुमचा फारसा परिचय नसावा आणि ते फार चांगले आहे , अन्यथा दुरान्वयानेही तुमचे मन : स्वास्थ या वयात विस्कटण्याची भिती वाटते.इतका प्रचंड कारभार सांभाळतांना तुमच्या हातात असते एक लहानशी खादीची पिशवी . तीसुद्धा दुरुन रिकामी वाटावी अशी . आणि मलातर हे दृश्य विनोदीच वाटू लागते . तुमच्या पेहरावावरुन आमच्या तुमच्या विषयींच्या कल्पनेला तडाच जातो . साधा पोषाख , तोही खादीचा आणि चांगल्या परिटघडी शिवाय आमच्या डोळ्यांना खादी पहाण्याची सवय नाही ! पण खरे सांगायचे तर तुमच्या बिन परीटघडीची ही शुभ्र , जाडीभरडी वस्त्रेच अजून खादीची लाज सांभाळून आहेत . तुमच्या कार्याच्या थोरवीचे समोरच्या माणसावर अजिबात दडपण येत नाही . तशी मुद्दाम तुम्हाला काळजी घ्यावी लागत नाही . अंगभूत नम्र सभ्यतेचा इतका चांगला आविष्कार क्वचित पहायला मिळतो . त्यामुळे एखादे वैयक्तिक दुःखही तुमच्यापुढे मोकळे करायला कोणाला संकोच वाटू नये . असा गोडवा तुम्ही वागण्यात आणला आहे. 

           ***

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...