मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

 

 ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.
    भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगाव शाखेत अध्यापक म्हणून माझा प्रवेश झाला .तेथून राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथे बदली झाली व   त्यानंतर माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथे मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली . त्यामुळे सुदैवाने नानासाहेबांचा सहवास मला लाभला . त्यातून त्यांच्या जीवन कार्यपद्धतीची जवळून ओळख झाली . त्यांनी केलेल्या विशाल , उत्तुंग , उदात्त पवित्र - शैक्षणिक कार्याचा मी एक साक्षीदार आहे .
  शिक्षणाचे त्रिकालबाधीत महत्त्वाचे सत्य जाणून शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भगिरथ प्रयत्न करणारे माननीय नानासाहेब य . ना . चव्हाण हे एक खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षि आहेत . बहुउद्देशिय शिक्षण प्रणालीद्वारे सामाजिक , राजकीय , आर्थिक समतेचा सुखी , सुसंस्कृत , सुदृढ समाज निर्मितीचा दुरदर्शीपणा ठेवून त्यांनी ज्ञानदानाचे ४८ वर्षांपूर्वी बीजारोपण केले . त्याचे आज प्रचंड वटवृक्षात रुपांतर झालेले आहे . अनेक वर्षापूर्वी आजच्या प्रमाणे कोणत्याही प्रकारच्या शासकीय सोयी , सवलती नसतांनाही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण संस्थेची स्थापना करुन समस्यांची आव्हाने स्वीकारीत व तितक्याच तत्परतेने समस्या सोडवित त्यांनी शैक्षणिक कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले . विद्यालयांसाठी स्वत : च्या मालकीच्या भव्य इमारती , प्रशस्त क्रीडांगणे , सुसज्ज प्रयोगशाळा , समृद्ध ग्रंथालये आदींसाठी त्यांचे अथक प्रयत्न चालू राहिले . त्यासाठी संस्थेला निधी , वर्गणी , देणग्या मिळविण्यासाठी त्यांची ऊन , वारा , पाऊस , थंडी या मध्येही पदयात्रा चालू राहायची . विद्यार्थीदशेत स्वानुभवलेल्या समस्या , अडीअडचणी , व्यथा यांची त्यांना पूर्ण जाण असल्यामुळे निराधार , गोरगरीब , दीनदुबळ्या , उपेक्षित व सर्वसामान्य मुलामुलींची स्वप्ने साकार होण्यासाठी , बालवाडी ते महाविद्यालय , अंधशाळा , आश्रमशाळा , विद्यार्थी वसतीगृह , कन्या छात्रालय आदींची अपार कष्टातून उभारणी करुन ज्ञानदानाचे व ज्ञानसंवर्धनाचे पवित्र कार्य सुरु ठेवले . आजच्या समाजासाठी हीच आधुनिक तिर्थक्षेत्रे ठरावित , केवळ व्यावसायिक , शैक्षणिक , कारखानदारी न करता बहुउद्देशीय शिक्षणप्रणाली स्वीकारुन वैज्ञानिक , तांत्रिक आदी विद्या शाखा उघडून ज्ञानाची क्षितीजे अधिक उंचावलीत , विस्तारीत केलीत . सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवून विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र कन्या विद्यालय व कन्या छात्रालय अनेक वर्षांपूर्वी सुरु करुन महात्मा फुले , शिक्षणमहर्षि कर्वे आदि समाज सुधारकांची स्त्री शिक्षणाची ध्येयवादी परंपरा नानासाहेबांनी पुढे चालू ठेवली . निराधार , उपेक्षित , परावलंबी , दुःखी , अंधजनांच्या रुक्ष , निरस जीवनातील अंधार दूर करुन त्यांच्या जीवनता आनंद , चैतन्याचा फुलोरा फुलविण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास जागृत करुन ते स्वावलंबी होण्यासाठी त्यांना नवी वेगळी दृष्टी देण्यासाठी त्यांनी अंधशाळेची स्थापना केली . यातून त्यांची करुणा , मानवता प्रतिबिंबीत होते . निराधार , निराश्रीत , उपेक्षित , दीनदुबळ्या गोरगरीबांसाठी आश्रमशाळा उघडल्यात . क्रीडा , कामगार , धार्मिक , सांस्कृतिक , सामाजिक शिक्षण आदी क्षेत्रातील सक्रीय योगदानातून   आदरणीय नाना साहेबांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची साक्ष मिळते . उत्तुंग , विशाल कर्तृत्वातून किर्ती , मानसन्मान प्रतिष्ठा लाभून देखील ते प्रसिद्धीपासून दूर राहिलेत । पदप्रतिष्ठेचा कधीही दुरुपयोग केला नाही . उच विद्याविभूषित । असूनही अहंकार दाखविला नाही . शांत , सालस , सोज्वळ , संयमी ,  निगर्वी , निस्पृह , निस्वार्थी स्वभाव गुणांमुळे त्यांच्या किर्तीत तेजोवलय अधिकच प्रभावीपणे खुलून दिसते . साधी राहणी , उच्च विचारसरणीचे प्रतीक म्हणजे माननीय नानासाहेब चव्हाण ! सानेगुरुजींच्या सेवा , त्याग , करुणा या सारख्ये नीतिमूल्यांवर आधारित ध्येयवादी जीवनाचा मार्ग त्यांनी अनुसरला . ' बहुजन हिताय , बहुजन सुखाय ' असे मानून सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी , कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले . एका सेवाभावी समर्पित जीवनाती ती एक गाथा आहे . ' कर्म हाच धर्म ' हे जीवनाचे सूत्र समजून या कर्मयोग्याची पूजा , यात्रा अखंडपणे चालू आहे .आदरणीय नानासाहेबांच्या शक्षण कार्याचा गौरव भविष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जावा असे महान ,उदात्त ,पवित्र कार्य केल्याने ते खरया पूर्णार्थाने शिक्षण महर्षी झाले आहेत.माननिय नानसाहे 'यशवंत' आहेत.ते 'किर्तीवंत' आहेत,ते 'आयुष्यवंत' होवोत . हीच प्रभुचरणी प्रार्थना.     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...