मुख्य सामग्रीवर वगळा

श्रमपंढरीचे वारकरी नानसाहेब(प्रा.पांडूरंग दोधू सुतार,बहाळकर,राष्ट्रीय ज्यु. काॅलेज,चाळीसगाव)

 

ज्यां च्या नावातच विजयाची पताका आहे असे नानासाहेब यशवंत , गुणवंत व धैर्यवंत तर आहेतच पण त्याच बरोबर संतही आहेत कारण संत नामदेवांनी सांगितलेली संतसज्जनांची लक्षणे पहा- 
    निंदील हे जन सुखे निंदू द्यावे । सज्जनी  क्षोभावे नये बापा      निंदा आणि स्तुती समान पै झाली| त्याची स्थिती आली समाधीला | 
 शत्रू आणि मित्र समसमानत्वे । तोचि पै देवाते आवडला । 
माती आणि सोने भासे समान तो एकनिधान योगीराज । 
नामा म्हणे ऐसे संत जे असती । तेणे पावन होती तिन्ही लोक ॥
        अडतीस वर्षापूर्वी माझ्या बहाळगावी त्यांच्याशी पहिली भेट झाली . त्यावेळी दोन देशसेवेसाठी , जनसेवेसाठी कार्यरत होते . महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण आणि चाळीसगावचे शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण , साधी राहणी , उच्च विचारसरणी हे त्यांचे साधे तत्वज्ञान . खादीचे पांढरेशुभ्र धोतर , पूर्णबाह्यांचा सदरा , डोक्यावर तशीच पांढरीशुभ्र टोपी , हातात लहानशी कापडी पिशवी आणि छत्री एवढ्या सरंजामासह नानाबाहेर पडतात . छत्री नाही पण पिशवी आजही असते . पिशवीलहान तिचे कार्य मात्र महान तिच्यात असतात पावतीपुस्तके , विनोबांची गीताई , नामदेव तुकोबांचे अभंग आणि सानेगुरुजींची पुस्तके . 
      नाना श्रमपंढरीचे वारकरी आहेत . श्रमदान हा त्यांचा स्थायीभाव आहे . आजच्यासारखी पूर्वी खेडोपाडी वाहनांची सोयनव्हती . त्यामुळे तरवाडे , वाडे , बहाळ , खेडगाव , पोहरे , कळमडू , दहिवद असा त्यांचा प्रवास पायीच असायचा . त्याच्या व  जनताजनार्दनाच्या श्रमातूनच आजची ज्ञानमंदिरे उभी राहिली . आजही तरुणांच्या बरोबरीने श्रमदान करतात . तरुण थकतात पण ते नाही . श्रमसेवेत त्यांनी प्राचार्य , मुख्याध्यापक , शिक्षक , विद्यार्थी , सेवक , ग्रामस्थ सर्वांनाच सहभागी करुन घेतले . त्यामुळे ही आपली संस्था आहे , ही आपली शाळा आहे . हे आपले कॉलेज आहे अशीच सर्वांची भावना झाली आहे . या सर्व शैक्षणिक इमारती ज्या खेडोपाडी    आणि शहरातून उभ्या राहिल्या त्या श्रमदानातून ! 
   श्रमदान शिबिरात नानांचा सहवास म्हणजे एक आनंद असतो त्यात त्यांची बौद्धिके असतात . अभंग आणि गाणी म्हणण्यात सर्वांना ते सहभागी करुन घेतात . थकवा आणि वेळ कसा निघून जातो तेही कळत नाही . बोलणे अतिशय कमी पण श्रम मात्र भरपूर . ' बोले तैसा चाले ' या तुकोबांच्या वचनाप्रमाणे त्यांचं वागणं आहे . 
  नाना श्रमपंढरीचे जसे वारकरी आहेत तसे ते पंढरीच्या विठोबाचे निस्सीम वारकरी आहेत . त्यांचा जन्म वारकऱ्यांच्या घरात झाला . माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा || आजही त्यांच्या घरात ही वारी चालू आहे . नानांची वारी फक्त दोन दिवसांची , आल्या आल्या चंद्रभागेमध्ये स्नान करीत . पिशवीत विनोबांची , साने गुरुजींची , संतांची पुस्तके व फराळाचे घेत . दर्शनाच्या बारीमध्ये रांगेत अगदी शेवटी उभे राहात . रांगे मध्ये घुसण्यासाठी ओळखीच्या लोकांनी कितीही आग्रह केला तरी ते तिकडे दुर्लक्ष करून गोपाळपूरयाला शेवटच्या माणसामागे उभे राहून  पंधरा ते वीस तासानंतरच विठोबाचे दर्शन घेत . श्रम घेऊन आणि धक्के खाऊनच त्यांनी देव पाहीला.
    संत नामदेवांचा त्यांचा एक आवडता अभंग आहे .
 काळ देहाशी आला खाऊ । आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१ ॥  .  कोण वेळे काय गाणे । हे तो भगवंता मी नेणे ॥२ ॥
टाळ मृदंग दक्षिणेकडे । माझे गाणे पश्चिमेकडे ॥३ ॥
नामा म्हणे बा केशवा । जन्मोजन्मी द्यावी सेवा ।।४ ।। 
    विशेष म्हणजे हा अभंग ते गाऊन दाखवितात . ' जन्मोजन्मी द्यावी सेवा ' या चरणावर जास्त भर देतात . कारण हा अभंग ते जगतात . संत विनोबा , परम कारुण्य आणि मांगल्याची मूर्ती साने गुरुजी ही नानांची आराध्य दैवते आहेत . त्यांनी विनोबांजवळून श्रम घेतले तर साने गुरुजींजवळून सेवा घेतली . साने गुरुजी कथामाला दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करते . विनोबांची ' गीताई ' आणि साने गुरुजींची ' मैत्री ' काव्यसंग्रह यांची संगत आजही नानांना आहे . साने गुरुजींची कविता सदैव त्यांच्या ओठावर असते .
    नानांच्या सहवासात जे आले असतील त्यांच्या बरोबर श्रमशिबिरात व पायी दिडींत सामील झाले असतील त्यांनाच समजेल की नाना ही कविता का म्हणतात आणि आपल्या मागून सर्व श्रमसेवकांना का म्हणायला लावतात ? कविता शिकणं , शिकवणं आणि त्याहीपेक्षा ती जगण्यातच शाश्वत आनंद आहे . शिक्षक आणि विद्यार्थ्यांविषयी नानांच्या मनात नितांत आदर आणि जिव्हाळा आहे . अगदी लहान मुलाशीही ते आदराने बोलतील . पण कामचुकारपणा व टाळाटाळ करणाऱ्यांवर ते रागावतात . ते रागावणं देखील प्रेमाचे असते . बोर्डिंगमध्ये असतांना नानांनी विद्यार्थ्यांना आईचे प्रेम दिले पण त्याच बरोबर त्यांना शिस्तही लावली . आज या संस्थेतून हजारो विद्यार्थी , विद्यार्थीनी शिकून बाहेर पडत आहेत . अनेकांचे संसार सुखाचे झाले . ही ज्ञानाची गंगा त्यांनीच खेड्यापाड्यात नेली . गरीबातल्या गरीब मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली झाली . सर्वत्र ज्ञानाचे मळे बहरले . श्रम करणाऱ्या नानांच्या हातांनी पंच्याहत्तरी ओलांडली . त्यांचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे . त्यांना दीर्घआयुष्य आणि आरोग्य लाभो ही पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो . श्रमपंढरीच्या ह्या महान वारक- याला शतश : प्रणाम !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...