मुख्य सामग्रीवर वगळा

य.ना.चव्हाण तथा नानासाहेब एक कर्मविर शिक्षणमहर्षी( डाॅ.एम्.टी.तेली ,प्रपाठक,भौतिकशास्र विभाग,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ,औरंगाबाद)

 

ज्यांचा स्वभावात सज्जनता , सहृदयता व संतांचे गुण असतात अशा व्यक्तिंना असे वाटत असते की आपल्या वाट्याला शिक्षण घेतांना जीवनाची चढण चढतांना ज्या हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागले . वाईट व लाजीरवाणी परिस्थिती भोगावी लागली अशा हालअपेष्टा , परिस्थिती इतरांच्या वाट्याला येऊ नये व त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे हे गुण , ही विचारसरणी श्री . य . ना . चव्हाण तथा नानासाहेबांची होती आणि म्हणूनच त्यांनी १ ९ ५० पासून आजतागायतच्या काळात चाळीसगाव परिसरातील लोकांसाठी शैक्षणिक सुविधांचा अभाव व विद्याथ्यांची वसतीगृहाची उणीव दुर करायचा चंग बांधून लोकसेवेला वाहून घेतले व इ.स. १ ९ ५० मध्ये चाळीसगाव येथे राष्ट्रीय वसतीगृहाची उभारणी करुन आपल्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली . त्यांना स्वतःला शिक्षणासाठी धुळे , पुणे असे भटकत कोणातरी सज्जनाच्या घरी आश्रय घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे लागले . अडचणी बरोबर वयही वाढत गेले . परंतु उशीरा का होईना त्यांनी बी ए . एल.एलबी पर्यंतचे शिक्षण त्या कठिण काळात पूर्ण केले . त्यांच्यासारखीच गुणी मुले चाळीसगाव परिसरात गरीबीत खितपत पडलेली बघुन त्यानी प्राथमिक व माध्यमिक शाळा चाळीसगाव व आसपासच्या खेड्यात उदा.पातोंडे , वाघळी , हिरापूर , तळेगाव , रांजणगाव , पाटणादेवी इ . ठिकाणी उघडून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या . त्या काळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे ए.बी. हायस्कूल व कॉलेज होते . व तेथे. शिक्षणाच्या सोयी उच्च दर्जाच्या होत्या . पण ही शिक्षणसंस्था ग्रामीण . भागात उतरली नाही . तिचे कार्यक्षेत्र शहरी भागापूरते मर्यादित राहिले . या पार्श्वभूमीवर नानासाहेब चव्हाणांचे कार्य महान आहे . 
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी नानासाहेबांनी शिक्षणसोयी त्यांच्या दारात आणून द्यायचा प्रयत्न केला . त्यात शहरी श्रीमंती नसेल , पडके घर , पडकी मोडकळीस आलेली एखादी जिनींग फॅक्टरी , अल्पश : भाड्याने घेऊन त्यात विद्यार्थी व शिक्षक यांच्या श्रमदानाने चिखल , माती वापरून डागडुजी करुन वरुन पत्रा किंवा धाबे बनवून विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उन्हापासून सावली व पावसापासून निवारा मिळवून दिला . ज्याला शिकविण्याची आवड , तळमळ आहे असे सुविद्य व ज्ञानी शिक्षक नेमण्याचा प्रयत्न केला . आर्थिक पुरवठा करण्यासाठी प्रत्येकी चार आणे याप्रमाणे विद्यार्थी , पालक व परिसरातील रहिवाशी यांचेकडून ऐच्छिक वर्गणी गोळा केली . 
  अशा सुरु केलेल्या शैक्षणिक सुविधांचा ज्या विद्याथ्यांना फायदा घ्यायचा होता त्यांनी घ्यायचा होता . नानांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन होतेच , शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचा उद्देशच तो होता . बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशा सवलतींचा फायदा घेतला . त्यात मी एक होतो , इ.स. १ ९ ५ ९ साली ३ वर्षांच्या शिक्षण खंडानंतर मी नानांनी वाघळीच्या सुरु केलेल्या हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला . वाघळीला हायस्कूल सुरु करायला नानांनी आणखी १/२ वर्षे उशीर लावलाअसता तर कदाचित मी हायस्कूलचे व तद्नंतरचे उच्च शिक्षण घेऊ शकलो नसतो व मी आज जो एक नामांकित प्राध्यापक व शास्त्रज्ञ आहे तो होऊ शकलो नसतो . माझ्यासारखाच फायदा मिळणाऱ्यात वड्याळ्याचे श्री . खुशाल गोजर पाटील ( बी.ई. ) नुतन मराठा कॉलेजचे प्राचार्य डॉ . के . आर . सोनवणे व डॉ . शिवाजी नाना पाटील ( एम.बी बी एस् . ) . औरंगाबादचे श्री . तेजकिरण आशकरण चोपडा ( बी.ई. ) , वाघळीचे डॉ . अभिमान कडू माळी ( एम.बी.बी.एस् . ) , गुरांचे प्रसिद्ध डॉक्टर श्री . भंगाळे इ . अनेक नामवंत व्यक्ती इतर परिसरातून नानासाहेबांनी सुरु केलेल्या हायस्कूलमधून निर्माण झालेल्या आहेत . असे आम्ही सर्व जण नानासाहेबांचे आयुष्यभर ऋणी आहोत . 
    साने गुरुजींची पुस्तके व वाङमय वाचून माझ्या मनात साने गुरुजींविषयी आदर व ओढ निर्माण झाली . नानासाहेबांची विचारसरणी , राहणीमान व व्यक्तिमत्त्व साने गुरुजींसारखे होते . त्यामुळे मला त्यांचा सहवास हवाहवासा वाटु लागला . म्हणून मॅट्रीक झाल्यावर मी नानांना विनंती केली की , मला आपल्या संस्थेत सामावून घ्यावे . नानांनी माझी व्यवस्थित समजूत काढली . उच्च शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले व उच ध्येयाची प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले . त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरीत होऊन मी पुढील उच्च शिक्षणाची वाटचाल सुरु केली . तथापि प्रत्येक सुट्टीमध्ये चाळीसगावी आल्यावर नानांची भेट घेऊन त्यांना माझ्या शिक्षणाचा अहवाल सादर करुन पुढील मार्गदर्शन घेतल्याशिवाय मी राहात नसे . माझे शैक्षणिक जीवन घडविण्यात प्राचार्य म . वि . फाटक , प्रा . द . ऊ . काकडे , प्रा . व्ही . डी . जोशी , प्रा . जी.डी. राठोड , अमळनेरचे प्रा . व्ही . पी . नेने , पुण्याचे प्रा . व कुलगुरु राम ताकवले , कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु कै अप्पासाहेब पवार यांची भर पडली . या सर्व भरभराटीला नानासाहेबांचे योगदान कारणीभूत झाले म्हणून अशा थोर कर्मवीर शिक्षणमहर्षि महात्म्याला माझे शतश : प्रणाम .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...