४५ वर्षाच्या अवधीत एका तालुक्याच्या शहरात स्थापन झालेली शिक्षणसंस्था फुलारते , डवरते , आहे आणि एखाद्या वटवृक्षासारखी ती अनेक शाखा,उपशाखांची अक्षरश: सावली होते.
ही चित्तरकथा आहे चाळीसगावच्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची आणि त्या वटवृक्षाची पेरणी आणि मशागत करणाऱ्या एका चिरतरुण उत्साही व्यक्तिमत्त्वाची , नानासाहेब तथा यशवंत नारायण चव्हाण , वय वर्षे ७५ फक्त !
१ ९ ५० साली चाळीसगावात एक राष्ट्रीय वसतीगृह उभारुन नानांनी आपल्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली . १ ९ ५३ साली राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ सहकारी तत्वावर स्थापन करुन त्या रोपट्याला एक दिशा दिली . ती दिशा होती राष्ट्रीयत्वाची , आपल्या एकात्मतेची , माणुसकीची , विश्वात्मकतेची .
शिक्षणाचा ढाचा कसा असावा ? त्यात कोणते विषय असावेत ? इत्यादी विषयांचा उहापोह करणारे तीन चार आयोग आले - गेलेत . त्यांच्यावर शिक्षणतज्ज्ञ , शिक्षणसम्राट आदींनी खूप चर्चा केल्या . शेवटी जे काही निष्पन्न झाले ते आज आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या रुपात आपल्या समोर आहे . या सर्व चर्चेतून आपल्या मोठमोठ्या शिक्षणतज्ज्ञांचे मत असे झाले आहे की , आज शिक्षणात मुल्य विचार नसल्याने समाजाची फार मोठी अधोगती होत आहे . तेव्हा राज्यकर्त्यांनी मोठा विचार करुन शालेय शिक्षणात मुल्य शिक्षणाच्या एका तासिकेची भर घातली आणि सर्व आहे . या एका तासिकेच्या द्वारे मुलांना शक्यतोवर पहिल्या तासाच्या वेळी मुल्य शिक्षण द्यावे . त्यासाठी काही ठिकाणी मनाचे श्लोक काही ठिकाणी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठांतरासाठी दिल्या जातात असे ऐकिवात आहे .या सर्व पार्श्वभूमीवर ४६ वर्षापूर्वी एका तालुक्याच्या गावी स्थापन झालेल्या एका सहकारी शिक्षण संस्थेने राबविलेला अभ्यासक्रम पाहिल्यावर मुल्य शिक्षणाचा गाजावाजा करणारयाना त्यांची इच्छा असल्यास आत्मपरिक्षणाची चांगली संधी मिळणार आहे.
भविष्यवेध घेणा - या या शिक्षणसंस्थेने ११ वर्षापूर्वीच संगणक अभ्यासक्रम सुरु केला . पण आपला पाया मजबूत करण्यासाठी श्रमसंस्कारांचे मुल्यही ही संस्था प्राणपणाने जोपासत आहे . आपली विद्यामंदिरे , त्यांचा परिसर सुंदर हिरवागार करण्यासाठी या संस्थतेची मुले घडपडत असतात . दुष्काळी भागात मदत करण्यासाठी ती धावतात . अंघांच्या शाळा ही संस्था चालविते . बालकांमध्य असलेल्या सुप्त गुणांची जोपासना , वाढ करणे हा तर या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे . म्हणून चित्रकला , संगीत , नृत्य , नाट्य आदी कलांचा विकास करणान्या स्पर्धाही ही संस्था आयोजित करते आणि आयोजित केलेल्या अशा स्पर्धातून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा म्हणून प्रयत्न करते.
आपल्या देशाची नीट माहिती व्हावी या हेतुने विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या जातात . संसदीय लोकशाहीची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली जातात . राष्ट्रपुरुषांचे स्मृती दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात
आणि मुख्य म्हणजे ज्या साने गुरुजींनी मुलांवर अपार प्रेम करून त्यांची एक पिढीच घडवून राष्ट्र कार्यासाठी उद्युक्त केली त्या साने गुरुजींची कथानाला या संस्थेत जागृतपणे कार्यरत आहे .
सर्व शिक्षक विद्यार्थी यांची ही सहकारी संस्था आहे . कारण या संस्थेचा मुळपुरुष स्वत: काम करणारा कार्यकर्ता आहे . त्याने आपल्या जीवनसंग्रामातून हे मुल्य संस्थेत आणि शिक्षक विद्यार्थी सहकार्यात रूजविले आहे.म्हणून हा वृक्ष असाच फोफावणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा