मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मवीर नानासाहेब चव्हाण(श्री.मधु नाशिककर,संपादक-कथामाला ,नौपाडा,ठाणे)

 

चाळीसगावचे श्री.य.ना.उर्फ नानासाहेब चव्हाण अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे कोषाध्यक्ष झाले तेव्हा त्यांची आणि माझी पहिली भेट झाली . पांढरे शुभ्र धोतर त्यावर पांढरा शुभ्र सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी असा अत्यंत साधा वेश , विनम्र आणि मृदु बोलणे या त्यांच्या प्रथम दर्शनाने मी भारावून गेलो . 

  प्रथम मला असे वाटले की नाना कुणी काँग्रेसवाले राजकीय कार्यकर्ते असावेत परंतु जसजसा त्यांचा परिचय होत गेला तसे कळले की नाना कुठल्याही राजकीय चौकटीत काम न करता केवळ शैक्षणिक क्षेत्रात काम करत असून सामाजिक बांधिलकीने आणि समर्पित वृत्तीच्या भावनेने त्यांनी स्वत : ला या क्षेत्रात झोकून दिलेले आहे . नाना ध्येयनिष्ठ असून आपल्या विचारांवर दृढ आहेत . हे त्यांनी अनेकवेळा सभांमधून आपले विचार मांडले तेव्हा दिसून आले . नानांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात ७ जानेवारी १ ९ २३ रोजी झाला . आई - वडिल वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांच्यावर लहानपणीच संत वाडमयाचा प्रभाव पडला . नानांची आई अत्यंत कष्टाळू , प्रेमळ आणि सोशिक होती . तेच संस्कार नानांमध्ये बालपणी उतरले . नानांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे पूर्वीची मराठी सातवी (व्हर्नाक्युलर फायनल ) आपल्या गावीच झाले . त्यावेळी ते जळगावा जिल्ह्यात १५०० मुलांत तिसरे आले . तरीही पुढे न शिकता शेती करुन सामाजिक कार्य करण्याचे त्यांनी ठरविले . कारण त्यावेळी  महात्मा गांधीच्या राष्ट्रीय आंदोलनाचा जोर होता . शेती करता करता नाना सामाजिक व राजकीय चळवळीतही भाग घेत होते . त्यावेळी त्यांना असे आढळून आले की आपण अधिक शिकले पाहिजे . तेव्हा त्यांनी हायस्कूल मध्ये प्रवेश घेऊन पुन्हा शिकायला सुरुवात केली १ ९ ४२ च्या चळवळीतही हायस्कूलमध्ये असताना आंदोलनात भाग घेतला आणि कारावासही भोगला . तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर आपले महाविद्यालयीन शिक्षण बडोदा येथे पूर्ण केले . बी . ए . झाल्यानंतर त्यांनी लॉ कॉलेजमध्ये कायद्याचेही शिक्षण पूर्ण केले आणि या काळात चाळीसगावच्या आनंदीबाई बंकट हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लौकिकही मिळविला . याच काळात त्यांना हायस्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून आल्या . तेव्हा शिक्षणक्षेत्रासाठी जीवन देण्याचे त्यांनी ठरविले . शिक्षकी पेशातील नोकरीचा राजीनामा देऊन १ ९ ५४ च्या अखेरीस त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना केली नाना स्वभावत : मृदु , सहनशील , बुद्धीवादी आणि दुसऱ्यासाठी सतत काहीतरी करण्याची प्रवृत्ती यामुळे त्यांचा मित्रपरिवार वाढत गेला आणि अनेक सहकारी त्यांना मिळत गेले . नानांनी स्थापन केलेल्या संस्थेचे काम नाना आणि त्यांचे सहकारी निरपेक्ष भावनेने  करतात . हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यात लोकांचे उदार सहकार्य मिळत गेले.

   नानांवर विद्यार्थी जीवनामध्ये महात्मा गांधी , आचार्य विनोबा आणि साने गुरुजी यांच्या जीवनाचा प्रभाव पडलेला होता आणि त्यामुळेच नानांनी आपला जीवनप्रवाह निश्चित केला . नानांचे सारे जीवन त्याग , करूणा , सेवा यावर आधारलेले आहे . ध्येयवादी आणि विनम्र सामाजिक कार्यकर्ते असा त्यांचा लौकिक आहे . नानांचा स्वतःचा परिवारही मोठा आहे . मुले , सुना सुशिक्षित आहेत परंतु नाना आपल्या घरच्या परिवारात न अडकून राहता त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षणक्षेत्रातील बृहत परिवाराला स्वतःला वाहून घेण्याचे टरविले ते आजतागायत           आज जळगाव जिल्ह्यात ४५ वर नानांनी आणि त्यांच्या सहकार्यानी निर्माण केलेली बालवाडीपासून तो महाविद्यालयापर्यंतची सर्व शिक्षणकेंद्रे आहेत . ही केंद्रे उभी करताना नानांनी अगदी दगडाच्या पाट्या वाहून नेणान्या सेवकापासून तो संस्थेचे संचलन करणान्या अध्यक्षापर्यंतच्या सर्व भूमिका अत्यंत नम्रतेने आणि पूर्णतेने साकार केलेल्या आहेत . या शिक्षणक्षेत्रात त्यांची एक अंधशाळा आहे आणि साने गुरुजींचे आंतरभारतीच केंद्रही  आहे .                            

       साने गुरुजींच्या श्यामची आई सुवर्णमहोत्सवात त्यानी श्यामच्या आईच्या शेकडो प्रती घरोघर पोहचविल्या . तर विनोबांच्या गीताईच्या १०००० प्रती आणि गीता प्रवचनाच्या ५०० प्रतीह घरोघर पोहचविल्या . या प्रती घरोघर पोहचविल्या एवढेच नव्हे तर त्यांचे वाचन करण्यास सर्वांना प्रवृत्त केले .      नानांनी शिक्षण क्षेत्राखेरीज विविध क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

अशा या आमच्या नानांना ७ जानेवारी  1998 ला ७५ वर्ष पूर्ण    होतात आणि त्यानिमित्ताने त्यांचा अमृतमहोत्सव साजरा करायचे ठरविले नसते तरच नवल घडले असते . नानांचा अमृतमहोत्सव ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी चाळीसगाव येथे भव्य प्रमाणात होत आहे .   या निमित्ताने नानांच्या कर्ममय जीवनाला  माझे नम्र अभिवादन आणि नानांना त्यांच्या अभीप्सित कार्यासाठी आरोग्यमय दीर्घायुष्य लाभावे ही हार्दिक शुभेच्छा.


 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...