मुख्य सामग्रीवर वगळा

मा.नानासाहेब य.ना.चव्हाण:अमृतमहोत्सवी चिंतन(प्रा.डाॅ.सौ.छा.द.निकम,मराठी विभाग प्रमुख राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव)

 

जीवनाचा  हे क्षणभंगूर आहे ' हे शाश्वत सत्य गौतम बुद्धाने शोधून काढले .   पण या क्षणभंगूर जीवनाचा सदुपयोग झाला तरच या जीवनाला महत्व प्राप्त होऊ शकते. केला . ते गौरविले जाऊ शकते. या गौरवाला पात्र ठरलेले आमचे मा . नानासाहेब य . ना . चव्हाण हे एक व्यक्तिमत्त्व , मा . नानासाहेबांच्या वयाला आज ७५ वर्ष होत आहेत . त्यांच्या जीवनातील एकेक क्षण त्यांनी सत्कारणी लावला आहे . त्यांच्या या घोर तपश्चर्येतूनच आज भडगाव , पाचोरा , चाळीसगाव तालुके शिक्षणाच्या प्रकाशात उजळून निघाले आहेत . ' शिक्षण ' हे एक सर्वश्रेष्ठ ध्येय त्यांच्या नजरेसमोर होते आणि हे ध्येय गाठण्यासाठी नानासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य या शिक्षण कार्यात समर्पित केले . राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा  अधिकाधिक विकास व्हावा हे जणू त्यांचे ब्रीदच होते . विकासकार्यात  ते अविरत कार्यरत आहेत . मा . नानासाहेब म्हणजे राष्ट्रीय शिक्षण  संस्था आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्था म्हणजे नानासाहेब असे जणु एक  समीकरणच होऊन गेले आहे . मा . नानासाहेबांनी सामाजिक  बांधिलकी मानून स्वत : ला या पवित्र कार्यात वाहून घेतले आहे . मा .  नानासाहेबांचे वय आज ७५ वर्ष झाले असले तरी तोच पूर्वीचा उत्साह  आजही त्यांच्या कामात दिसून येतो . त्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाने ' गाठलेला उच्चांक म्हणजे आमचे सर्वांग परिपूर्ण राष्ट्रीय महाविद्यालय  आणि महाविद्यालयाची वास्तू होय . बालवाडी पासून ते मर्यादित ठेवले न महाविद्यालयापर्यंत त्यांनी शैक्षणिक प्रगती साधलेली आहे . हे कुणीही  नाकारु शकणार नाही . त्यांनी एकूण ४६ , शैक्षणिक शाखांचा विस्तार  केला . ही अपूर्व अशी कामगिरी आहे . त्यांच्या या कर्तृत्वामागे म. गांधी , पुज्य साने गुरुजी , विनोबा भावे यांची प्रेरणा आहे . याशिवाय  त्यांनी बालपणी समाजात घेतलेले अनुभव , शिक्षणासाठी त्यांना घ्यावे लागलेले कष्ट , त्यांच्या आई - वडिलांचे संस्कार आणि त्यांनी  बालपणी वाचलेले धार्मिक ग्रंथ यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण घडण झालेली आहे . म्हणून ' कर्तृत्व ' , ' निष्काम सेवा ' हेच त्यांच्या जीवनाचे ब्रीद ठरले आहे . सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी शिक्षणाचा  प्रवाह नेऊन सोडला आहे . गोर - गरीब , गिरीजन बहुजनांपर्यंत  खेडोपाडी शिक्षणाची सुविधा त्यांनी केली . चाळीसगाव शहरापासून  दूर असणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थीनींना त्यांच्याच गावात किंवा  जवळपास शिक्षणाची व्यवस्था करुन देऊन खूप मोठे राष्ट्रीय कार्य  त्यांनी केले आहे . हे शिक्षणाचे पवित्र कार्य त्यांनी एकनिष्ठेने ,  नि : स्पृहतेने केले आहे आणि म्हणूनच जीवनात त्यांना कधी अपयश  आले नाही. त्यांनी समाजाची खरी सेवा केली आहे . या सेवेचे त्यांना फळ मिळाले ते मानसिक समाधान . खरा कर्मयोगी कुठल्याही  फळाची अपेक्षा करीत नसतो . असे भगवत् गीतेत म्हटले आहे . ' कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन् ।' मा . नानासाहेबांनी केवळ शिक्षणापुरतेच आपले कार्यक्षेत्र  मर्यादित ठेवले नाही तर त्यांच्या कार्याचे क्षेत्र हे विशाल आहे . राष्ट्रीय  सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . चाळीसगाव या संस्थेची स्थापना  होणेपूर्वी मा . नानासाहेबांनी चाळीसगाव येथे इ . स . १ ९ ५० मध्ये गोरगरिबांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून राष्ट्रीय वसतीगृहाची उभारणी केली . इ . स . १ ९ ५१ ते १ ९ ५४ पर्यंत चाळीसगाव येथील आ . बं . हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि ज्ञानदानाचे कार्य केले . सर्व सामान्य गरीबांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून डिसेंबर १ ९ ५३ मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे छोटेसे रोप लावून प्रयत्नाने त्याचे आज वटवृक्षात रूपांतर केले . या वटवृक्षाच्या छायेत अनेक विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहेत . अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन मा . नानासाहेबांनी केलेले हे महान कार्य पाहिले म्हणजे या संस्थेत आपण काम करीत आहोत याचा आभिमान वाटतो . 
  मा . नानासाहेब उस्मानाबाद - लातूर येथे भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी , त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी साने गुरुजी कथामाला संचलित मनोबल भावजागर दिंडीत सहभागी झाले होते . साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव मा . नानासाहेबांमध्ये खूप खोलवर असा रुजलेला आहे . त्यामुळेच साने गुरुजींच्या विचारांचे स्वत : प्रत्यक्ष कृतीतून पालन करुन विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत , साने गुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावेत या उद्देशाने त्यांचा सानेगुरुजी कथामाला या संस्थेत सक्रीय सहभाग आहे . साने गुरुजींचे विचारधन मनसोक्त सर्वांना लुटता यावे म्हणून साने गुरुजी वाचनालय सुरु केले . खानदेशाचा शैक्षणिक विकास अधिक व्हावा म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे स्थापन करावे या चळवळीतही ते सहभागी होते . विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीने ते सतत प्रयत्नशील असतात . विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे , श्रमाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून ते सतत श्रमदानाची शिबिरे भरविण्यात आनंद मानतात . विद्यार्थ्यांचा बौद्धिक , मानसिक विकासा बरोबरच त्यांचा शारीरिक विकास व्हावा म्हणून क्रीडा क्षेत्राकडेही ते आवर्जून लक्ष देतात . म्हणूनच ते राष्ट्रीय क्रीडा मंडळाचे संस्थापक व अध्यक्षपदाची धुरा आजतागायत सांभाळीत आहेत . विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ' विनोबा गीताई अभ्यास केंद्राची निर्मिती त्यांनी केली . 
  मा . नानासाहेबांच्या एकूणच कर्तृत्वाचे चिंतन करता त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण सत्कारणी लागलेला आहे . त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य बहुमोल आहे . राष्ट्रीय शिक्षण संस्थारुपी मंदिराचा त्यांनी पायाही घातला आणि त्यावर राष्ट्रीय महाविद्यालयीन शिक्षणरुपी कळसही चढविला . या कळसावर बालसेवा आणि नंदिनी पुरस्काररुपी ध्वज फडफडत आहे . या पुरस्करातून मा . नानासाहेबांच्या कार्याचा किर्तीसुगंध सर्वदूर गेला आहे . त्यांचे कार्य उदंड आहे . त्यांचा आज ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या चैतन्यरुपी वातावरणात साजरा होत आहे . ही त्यांच्या कार्याची पावतीच त्यांना मिळाली आहे . परमेश्वर मा . नानासाहेबांना उदंड आयुष्य देवो हीच शुभेच्छा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...