मुख्य सामग्रीवर वगळा

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)



चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन ! 
    या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी'पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची बातमी वाचण्यात आली आणि  अमृतमहोत्सवी वर्षात एका जेष्ठ शिक्षण तज्ञाचा यथोचीत सन्मान होतोय याचा मनस्वी आनंद झाला.
    सुप्रसिध्द आंग्ल कवी आणि नाटककार शेक्सपिअर यांनी
म्हटले आहे त्याप्रमाणे काही व्यक्तींना जन्मजात थोरपण लाभलेले असते तर काही व्यक्ती स्वकर्तृत्वावर थोरपण प्राप्त करुन घेत असतात आणि काहींवर लादलेले असते . आदरणीय नानासाहेबांना लाभलेलं थोरपण ही त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आणि स्वकर्तृत्वाची साक्ष आहे . साने गुरुजींची सेवाभावीवृत्ती नानांनी प्रत्यक्षात मनोभावे जपली आहे त्यामुळे त्यांचे एकूणच व्यक्तित्व आदरयुक्त आणि सर्जनशील बनले आहे . राष्ट्रीय शिक्षण संस्थेला त्यांच्या रुपाने सर्वस्व झोकून देणारे खंबीर नेतृत्व प्रथम पासूनच लाभल्याने गेल्या ४८ वर्षात १ ९ ५३ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे आज एका प्रचंड वटवृक्षात रुपांतर झालेले आहे . संस्थेच्या . चाळीसगाव शहर आणि तालुका तसेच भडगाव आणि पाचोरा तालुक्यातही बालवाडी , प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा , कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये , अंधशाळा आणि आश्रमशाळा अशा ४६ शाखांमधून सुमारे २५,००० विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे आणि ज्ञानसंवर्धनाचे पवित्र कार्य अव्याहतपणे सुरु आहे . एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लौकिक असतांनादेखील राष्ट्रीय वसतीगृहाच्या कामात पूर्ण वेळ देता यावा म्हणून १ ९ ५४ साली नानासाहेबांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुढे राष्ट्रीय शिक्षणसंस्थेची अधिकृत नोंदणी केली . शिक्षणासोबतच नानासाहेबांनी सामाजिक कार्याची देखील मनस्वी आवड आहे . ' ज्ञानदाना सोबतच श्रमदान ' हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे . संत विनोबा भुदानपदयात्रा , गीताई पदयात्रा , भावजागरण दिंडी , साने गुरुजी मंगल यात्रा या सारख्या रचनात्मक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता . या वयातही आश्रमशाळेच्या बांधकामावर स्वत : लक्ष ठेवण्यासाठी नानासाहेब जेव्हा तहानभूक विसरुन जातात आणि काटकसरीने नवनिर्मिती करतात . तेव्हा त्यांच्याविषयी विलक्षण आदर वाटतो . " साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ' हे त्यांच्या यशस्वी जीवनाचे गमक आहे . त्यांचा वाचनाचा व्यासंगही चांगल्यापैकी आहे . एखाद्या महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन असो की पाटणादेवीच्या रम्य परिसरातील आमच्या सारख्या राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर असो नानासाहेबांचे  विचार अनुभल कथन सारयांनाच भावून जाते आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करते.
  आदरणीय नानासाहेबांच्या या अमृतमहोत्सवी वाटचालीत त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. सुशीलाताई यांचा तसेच सारया कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे .
 आठवणीच्या साठवणीत अनेक प्रसंग आहेत . तूर्त एव्हढेच. मा. नासाहेबांना दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना ! !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...