मुख्य सामग्रीवर वगळा

गोरगरिबांचे कैवारी(श्री.आत्माराम मुंगा पाटील,चेअरमन समाज सुधारक मंडळाने दीनबंधू बालकगृह,धुळे)

 

श्री. नानासाहेब य . ना . चव्हाण यांना शिक्षणासाठी जो त्रास सहन करावा लागला तो त्रास माझ्या गोरगरीब बांधवांना होऊ नये ही उर्मी मनाशी ठेऊन नानांनी शैक्षणिक संस्था स्थापन करुन तिचा विस्तार केला . यामुळे खेड्यापाड्यातील , झोपडीतील हजारो विद्यार्थी त्यांना दुवा देत आहेत .     नानासाहेबांच्या जीवनात धुळ्याचा अतुट संबंध आहे . शेतकी व माध्यमिक शिक्षण धुळ्यात , स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्याचे धाडस धुळ्यात , विद्यार्थी आंदोलनामुळे घडणारी जेल यात्रा धुळ्यातील अशा विविध प्रसंगांनी धुळ्याने त्यांच्या मनात घर करणे साहजिक आहे . 
   आचार्य कुल व अ . भा . साने गुरुजी कथामाला या लोकशिक्षण करणाऱ्या व अनौपचारिक नीतिमूल्य शिक्षण देणाऱ्या संस्थामुळे नानांशी संबंध आला . आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि विनम्र  वागणुकीने नानासाहेब चव्हाण समोरच्याला जिंकून जवळीक निर्माण करतात . एकदा झालेली मैत्री कमी न होता वाढतच जाते . अशा प्रकारे इतरांना जिंकणारे हृदय त्यांचेपाशी आहे . 
  सर्वांशीच मनमिळावूपणाने वागून खेड्यापाड्यात पायपीट करुन शाळा काढल्यात . यातून शिक्षण घेऊन अनेक डॉक्टर , वकील , इंजिनियर , शिक्षक , प्राध्यापक तयार झालेत . ते अनेक ठिकाणी नानांना भेटतात तेव्हा नानांचे अंत : करण भरुन येते . डोळे पाणावतात आणि धन्यता वाटते . नाना राजकारणात पडले असते तर त्यांना हा मुलांकडून मिळणारा निखळ आनंद अनुभवायला मिळाला नसता . त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा आणि त्यांनी शंभरी गाठावी ही सदिच्छा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...