मुख्य सामग्रीवर वगळा

एक द्रष्टा(श्री.उदेसिंग रामसिंग पवार,बी.एस्.सी.(अँग्री.)श्रीकृष्ण सिनेमा समोर ,चाळीसगाव)

 

                   श्री. यशवंतराव नानांचे नाव कसल्याही कारणाने कुठेही निघाले की राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक उपक्रमांचा आलेख डोळ्यापुढे चटदिशी उभा राहतो . सन १ ९ ५० साली ग्रामीण भागातील शेतकरी व कामकरी समाजातील मुलांना उच्च चांगले शिक्षण मिळण्याच्या हेतूने श्री . नानांनी प्रथम मुलांसाठी फक्त एका वसतीगृहाची स्थापना केली . कदाचित त्यावेळेस याच एका मामुली उपक्रमाचा विस्तार आज झालेला आहे . येवढा विस्तार करावयाचा त्यांचे मनामध्ये कल्पनाही नसेल , परंतु चांगल्या माणसाने चालविलेल्या चांगल्या कामाला कुणीही सुज्ञ माणुस सहकार्य करतो या उक्तीप्रमाणे श्री . नानांना त्यांनी सुरु केलेल्या या शैक्षणिक कामास तालुक्यातील त्यावेळच्या सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांनी खुप मोठ्या प्रमाणात अगदी मनापासून मोलाची साथ दिली . त्यात कै . रामराव जिभाऊ , कै जे . एस् . आप्पा , कै . मोतीराम भाऊ , कै . राजाराम भाऊ , श्री . सोनूसिंग अण्णा , कै . रामभाऊ देशमुख , कै . भिकनरावदादा , कै महारु हाजी , कै . देवराम भाऊ या व आणखी अशा बऱ्याच कार्यकर्त्यांची नावे घेता येतील . राजकीय विचार काहीही असले तरी श्री.नानांचे संस्थेचे कामासाठी सर्वजण एकत्र येऊन अगदी एक विचाराने कुठलाही निर्णय घेत असत व त्यासाठी प्रयत्न करीत असत . हे मी स्वत : अनुभवलेले आहे . या सर्व भिन्न भिन्न विचाराच्या मंडळींना एकत्रित बसवून  त्यांच्याकडून श्री . नानांनी त्यांनी अंगिकारलेले हे पवित्र शिक्षणाचे काम करुन घेण्यासाठी जे कौशल्य दाखविले ते खरोखरच वाखाणण्या जोगेआहे .                                                               
    सामाजिक कार्यकर्ता म्हटला म्हणजे त्याचे काम एकाच संस्थेपुरते मर्यादित राहत नसते . त्यास अनेक संस्थांमधुन असावे अशी इच्छा निर्माण होते . श्री . नाना मात्र याबाबत अपवाद आहेत . मग तो कार्यकर्ता त्याचे इच्छेनुसार प्रत्येक संस्थेत जाण्यासाठी वाटेल त्याच्याशी सलगी करुन कुणाच्याही परिचयाची पर्वा न करता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करुन प्रयत्न करीत असतो . त्यामुळे त्यास अनेक विरोधक निर्माण होतात व मग त्यास कुठलेही काम हे विरोधक नीट व्यवस्थित करु देत नाहीत व या अशा विरोधामुळे त्यास कुठलेही काम मग ते चांगले जरी असले तरी ते करणे शक्य होऊ शकत नाही . अशी शेकडो उदाहरणे आपण पहातो आहोत . परंतु श्री . नानांनी मात्र एक विशिष्ट ध्येय डोळ्यापुढे ठेऊन ते सर्वार्थाने परिपूर्ण करण्याकरीता शिक्षणप्रसाराचे कामाव्यतिरीक्त कुठल्याही इतर बाबींकडे दुरान्वयाने देखील लक्ष दिले नाही . त्यामुळेच त्यांना या शिक्षणसंस्थेचा एवढा मोठा पसारा वाढविणे शक्य होऊ शकले . त्यांना अनेकवेळा काही हितसंबंधी मंडळींनी त्यांच्या स्वत : च्या काही मनोकामना पूर्ण करुन घेण्यासाठी केवळ त्यांचा वापर करुन घेण्याच्या दृष्टीने इतर संस्थांमध्ये त्यांनी लक्ष घालावे असा अनेक वेळा आग्रह देखील करुन पाहिला . परंतु श्री . नानांना त्या बाबत  कधीच अभिलाषा झाली नाही व त्यांच्या त्या आग्रहाला ते बळीही पडले नाहीत आणि म्हणूनच त्यांना या एकाच संस्थेचे काम त्यांच्या कल्पनेप्रमाणे अगदीच व्यवस्थित करता येऊन त्यायोगे आज कितीतरी ग्रामीण व शहरी विभागातील मुलामुलींना त्याचे इच्छेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळू शकत आहे .
   श्री . नानांचे स्वभावात काही दोष जरुर आहेत . बऱ्याच मंडळींचे त्यांचेशी काही प्रश्नांवरुन मतभेद होत असतात . परंतु संस्था व त्या संस्थेच्या विकासासाठी श्री . नाना करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्या मंडळींना देखील ते मतभेद विसरावे लागतात . एखाद्या प्रश्नांवरुन मतभेद झाला म्हणून त्याचा परिणाम एकंदरीत संस्थेच्या विकासाच्या आड येऊ न देणे हे खऱ्या कार्यकर्त्याचे प्रमुख लक्षण असते आणि अगदी तशाच विचाराची तालुक्यात बरीचशी कार्यकर्तेमंडळी असल्याने या संस्थेचा सर्वांगीन विकास होऊ शकलेला आहे . संस्थेच्या कामासाठी श्री . नानांचा मोठा अट्टाहास असतो . समोरच्या माणसास हो म्हणावेच लागतेे व काम करुन द्यावेच लागते . काही वेळेस शारीरिक क्लेश देखील संस्थेच्या कामासाठी श्री . नानांनी घेतलेले आहेत आणि म्हणून त्यांचे संबंधाने एक वेगळी आदराची भावना समजदार माणसाचे मनात निर्माण झालेली आहे . व नानां विना राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसार मंडळ ही कल्पनाही चांगल्या विचारी माणसाचे मनाला रुचत नाही व रुचणार नाही म्हणून काही स्वार्थी विचारांनी का होईना परंतु नानां परमेश्वराने चांगले आरोग्याचे दीर्घआयुष्य द्यावे हीच प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...