मुख्य सामग्रीवर वगळा

जीवनाचा नम्र उपासक(प्रा.मनोज शितोळे,पदव्युत्तर मराठी विभाग ,राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव)


 'निश्चयाचा महामेरु बहु जनासी आधारु ' असे खानदेशचे शिक्षणकर्मी नानासाहेब चव्हाण सात जानेवारीला वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण करीत आहेत . नानासाहेबांचे सर्व आयुष्य महान यज्ञ म्हणावा लागेल . १ ९ ५३ पासून ज्ञानदानाचं महान कार्य सातत्याने करण्यात धन्यता मानणारे नानासाहेब दुर्मिळच व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल .

     साहित्य हा नानासाहेबांचाआवडता प्रांत.साहित्य हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे त्यामुळे ते जीवनवादी साहित्याचा  पुरस्कार करतात . साहित्याची निर्मिती ही चिंतनशील प्रवृत्तीतून व्हायला पाहिजे . साहित्यातून वास्तवदर्शन चित्रीत झाले पाहिजे . साहित्यिकांना आदर्श जीवनाचे उन्नयन होईल असे जीवनाचे सखोल तत्वज्ञान साहित्याच्या माध्यमातून साहित्यिकानी समाजाला सांगावे साहित्य हा समाजाचा आधारस्तंभ आहे 

   आजच्या शिक्षकाविषयी नाना म्हणतात , की शिक्षकांनी  विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास न करता खेळांना प्राधान्य देऊन त्यांचा शारीरिक विकासही करावा व नैतिक मुल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे . शिक्षक हया शब्दाची संकल्पना ते अशी करतात

 शि - स्वत : ची

 शिस्त क्ष - क्षमता

 क - कर्तव्य

 विद्यार्थी हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्याला विज्ञानवादी भूमिकेतून जीवनाच्या दिशा शोधायला लावायला पाहिजे . 

आज धर्माविषयी अनेकांची अनेक मते आहेत . परंतु नानासाहेब ' मानवता ' हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानतात . मानवी संस्था टिकविण्यासाठी नानांना निर्लेप असे मानवी जीवन हवे आहे . जातीभेदाच्या , धर्मभेदाच्या पलिकडे त्यांची दृष्टी स्थिर झाली आहे . ' सत्यनीति धर्म ' हेच खऱ्या धर्माचे मर्म आहे . साने गुरुजींप्रमाणे मानवाने एकमेंकावर प्रेम करावे , बुद्धीवादाने जीवनाच्या दिशा शोधाव्यात व आपल्या कर्तव्यात सातत्य ठेवावे असे ते आपले विचार मांडतात . 

   परंपरेने वारकरी सांप्रदायाचे तत्वज्ञान नानासाहेबांच्या घरात नांदत होते . त्यातच साने गुरुजी , विनोबा भावे , गांधीजींची प्रेरणा नानासाहेबांना मिळाली . Man is not developed they develop themselves असे विधान प्रसिद्ध विचारवंत डॉ . नेरेरे करतात . परंतु समाजाचा किंवा स्वत : चा विकास करण्यासाठी कोणते तरी तत्वज्ञान घेऊन मार्गक्रमण करावे लागते . नानांनी ' ईश्वर जन जो तेणे कहीत् जो दिन पराये जाने रे ' या तत्वाचा आयुष्यभर पुरस्कार केला .      

    शिक्षण हे समाजसुधारणेचे मूळ आहे . जीवनाचे दर्शन घडविणारे महान साधन आहे . शिक्षण हीच ग्रामीण समाजाची गरज आहे . यावर नानासाहेबांचा दृढ विश्वास होता . नानांच्या ज्ञानदानाच्या महान कार्याला प्रतिकुलतेच्या रखरखत्या उन्हात सुरुवात झाली . परंतु प्रतिकुलतेशी झुंज घेणारेच समाजाचा चेहरामोहरा बदलत असतात . मानभंग , उपेक्षा हे शब्द त्यांच्या शब्दकोषात नसतात . नाना त्याच परंपरेचे पाईक होते . आपल्या जीवनात तत्वनिष्ठ भूमिका व चिरंतन जीवनमुल्यांना त्यांनी महत्वाचे साहित्य हा नानासाहेबांचा आवडता प्रांत , साहित्य हे स्थान दिले .

नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला विश्वात्मक अधिष्ठान आहे . अनेक गुणांचे एक अभूतपूर्व रसायन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकरुप झाले आहे . ते कुशल संस्थाचालक आहेत , शिक्षणतज्ज्ञ आहेत , साहित्यप्रेमी आहेत . मराठी भाषेचे प्रेमदाते आहेत . याही वयात काम करण्याचे सातत्य आहे .     जीवनाच्या ह्या नम्र उपासकास ईश्वर दीर्घायुष्य देवो हेच अभिष्टचिंतन !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...