सु खी माणसाचा सदरा शोधायला लागलो तेव्हा विज्ञानाचा व विवेकी बुद्धिवादाचा कैफ उतरला होता ; मी पस्तीशी ओलांडली होती आणि माझ्या अर्ध्या दमदार आयुष्याचा इतिहास झाला होता .
एव्हाना मी प्रथितयश डॉक्टर झालो होतो . राजकारणात मुसंडी मारली होती . पैसा व नावलौकिक मिळाला होता . व्यावसायिक , सार्वजनिक व राजकीय जीवनात मी अधिकाधिक व्यस्त व लौकिकदृष्ट्या यशस्वी होत होतो . इर्षा , स्पर्धा , राजकीय लढाया आणि जिंकण्याची जिद्द यांनी सर्व जगणे व्यापून टाकले होते . हे चक्र कधी थांबेल , याचा शेवट कशात होईल व याचे फलित काय निघेल याचे उत्तर दृष्टिपथात नव्हते .
जीवनाची क्षणभंगुरता सर्वांना समजते . डॉक्टर म्हणून मी ती जवळून व सातत्याने अनुभवित होतो . आयुष्याचा एक एक पळ हातातून निघून जातांना पाहात होतो . जे मिळविले ते व्यावहारिक जीवनाचा व जागृत मनाचा भाग होते . आतले मन समाधानी नसावे . म्हणून ते सुखी माणसाचा सदरा शोधायला लागले तेव्हा मी अस्वस्थ झालो . तसे आपण सगळे केव्हातरी आपल्या जीवनात सुखी माणसाचा सदरा शोधू लागतो . अर्थात त्यासाठी आधी सुखी माणूस सापडावा लागतो . तुकाराम महाराजांनी फार पूर्वीच सुख जवापाडे व दुःख पर्वता एवढे असल्याचे सांगून ठेवले आहे . पण आता आपण सर्व भौतिक शास्राच्या योगाने सुखसाधने निर्माण कराण्यात फार मजल मारली आहे . माणसांची गर्दीही अफाट बाढली आहे . त्यामुळे खरे तर आता सुखी माणूस लवकर सापडला पाहिजे. पैसा , सत्ता , यश यांनी काही भाग्यवानाच्या हाती पूर्वीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत . उलट इंदिराजीच्या आणि राणी इलीझा बेथच्या या आपल्या काळात सुखजवाऐवजी परमाणू एवढे झाल्यासारखे वाटू लागले आहे .
तरीही मला सुखी माणसाचा सदरा सापडला ! " काखेत कळसा आणि गावाला वळसा " अशी आपल्या ग्रामीण भागात म्हण आहे . तसा मला मात्र सुखी माणूस घरातच सापडला , आमचे मामा आणि आता वयाची सफल पंच्याहत्तरी पूर्ण करणारे चाळीसगावच्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे संस्थापक - चालक श्री . यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या अंगावरील नेहमीचा जाड्या भरड्या खादीचा नेहरु सदरा . हाच तो सुखी माणसाचा सदरा होय .
मी देखील आता साठीला आलो आहे . पंचवीस वर्षापूर्वी हा सुखी माणसांचा सदरा सापडला नसता तर आजही मी तुकाराम महाराजांचा सुख जवापाडेचा अभंग आळवित बसलो असतो . तो सदरा सापडला आणि मी देणेघेणे , यशअपयश , आशानिराशा , माझेतुझे किंबहुना जगणे मरणे या द्वंद्वापासून मोकळा होऊ लागलो . " Biggest truths are the simplest " अशी म्हण आहे . तसा हा परिणाम एका साध्या पण विश्वव्यापून दशांगुळे उरणाऱ्या मनाच्या आध्यात्मिक वृत्तीतून निर्माण होणाऱ्या क्रियाशील श्रद्धेचा होय .
माझे वडिल कै . भास्करराव देशमुख चौफेर वाचन असलेले अत्यंत व्यासंगी शिक्षक आणि कठोर बुद्धिवादी कम्युनिस्ट होते. मार्क्सच्या सर्व पोथ्यांचे वाचन व चर्चामाझ्याही आवडीचा भाग असे . अगदी लहानपणापासून ते दहावी पर्यंत दिवाळीची व उन्हाळ्याची सुटी मिळून वर्षातून किमान २ महिने तरी मी आजोळी मामांचे गावी रांजणगावी राहात असे . तिथे दिवसभर शेतात व संध्याकाळी घरी आजोबांचे संवगडी असलेल्या तुकाराम - ज्ञानेश्वरांशी गाठीभेटी होत असत , आजोबांची एकतारीवरील भजने हा माझ्या सारख्या एका अपरिपक्व व अजाण मार्क्सवाद्यालाही मोठा आनंदाचा अनुभव असे .
असे मार्क्स आणि तुकाराम - ज्ञानेश्वर माझ्या मनावर व डोक्यात आदळले . पुष्कळ पुढे माझ्या लक्षात आले की पाच सातशे वर्षांपूर्वी तुकाराम - ज्ञानेश्वराने माणसाच्या दुःख निवारण्याची जी थेअरी ( तत्वे ) सांगितली होती तीच मार्क्सच्या प्रेक्टीकलमध्ये होती . मार्क्सच्या कोरड्या बुद्धिवादी अनुयायांनी आध्यात्मिक श्रद्धेचा त्याग केल्याने त्यांची मार्क्सच्या समाजवादाची , माणुसकीची गाडी चुकली आणि त्यामुळे सुखी माणसाचा सदरा त्यांच्या हाती लागलाच नाही .
श्री . यशवंतराव नानांची मनोभूमिका मुळातच श्रद्धावान . असल्याने त्यांच्यावर आमच्या आजोबांचा म्हणजे त्यांचे वडिल कै . नारायणदादा यांचा आध्यात्मिक श्रद्धेचा संस्कार अत्यंत दृढपणे रुजला आहे . नानांच्या संस्कारक्षम तरुण वयात महात्मा गांधी , विनोबाजी भावे व साने गुरुजी यांची भारतीय जनमानसावर जबरदस्त राजकीय व आध्यात्मिक पकड होती . या सगळ्या महापुरुषांच्या सेवाभावी आध्यात्मिक जीवनदृष्टीचा पारदार्शिक स्पर्श नानांच्या संपूर्ण जीवनाला तेव्हाही व आताही व्यापून राहिला आहे . म्हणून व्यक्तिगत , सांसारिक व व्यावहारिक स्वार्थ त्यांचे पासून आजपावेतो दूर राहिले . सेवाभावाने जगण्यासाठी त्यांना स्वत : शी फार मोठा I झगडा करावा लागला असे दिसले नाही .
बरीच वर्षे ते करगाव रस्त्यावरील राष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाच्या तळमजल्यावरील ३ खोल्यात आपला संसार स्थापून होते . तिथे कधी मी मुक्कामाला राहिलो की सकाळी , संध्याकाळी वसतीगृहातील विद्याथ्यांची प्रार्थना ऐकू येई . त्यात गीताई मधील स्थितप्रज्ञाच्या वर्णनाचा समावेश असे . माझ्या मनात तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी आजोबांच्या एकतारीशी जोडली गेली आहे . तशीच चाळीसगावच्या त्या विद्यार्थी वसतीगृहातील स्थितप्रज्ञ वर्णनाची प्रार्थना नानांच्या जीवनाशी व त्यांच्या शैक्षणिक कार्याशी जोडली गेली आहे . सुखी माणसाचा सदरा मला सापडला तेव्हा मनात या स्थितप्रज्ञ वर्णनाच्या प्रार्थनचाच उजेड पडला होता .
आताच्या शिक्षणक्षेत्राचे रुपांतर अल्पकाळात विनाकष्टाने प्रचंड पैसा मिळवून देणाऱ्या एका अत्यंत किफायतशीर इंडस्ट्रीत झाले आहे . एकाएका वर्षात हे शिक्षणवीर लक्षाधीश होत आहेत आणि दोन पिढयांची विनासायास बेगमी करीत आहेत . अशा काळात कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षी कर्वे , डॉ . दादासाहेब घोगरे यांच्या मार्गान गावोगाव व घरोघरी एक छत्री काखोटीला मारून झिजलेल्यापायताणांनी पायी , सायकलने , एस्.टी.बसने प्रवास करीत जाऊन सामान्य माणसापासून पै - पैसा जमा करुन त्या बळावर सुमारे ५० शाळा , कॉलेजांचा प्रचंड संसार उभा करावयाचा व तोही स्वतःच्या न व्यक्तिगत संसारावर उभा जन्म पाणी सोडून ! ही असामान्य घटना " आहे . मागील पिढीत गांधीजींच्या चरित्राच्या परीसस्पर्शाने अनेक सामान्य माणसातून असामान्य कार्यकर्ते विविध क्षेत्रात उभे राहिले त्याचे यशवंतराव नाना एक जिवंत उदाहरण आहे .
अध्यात्माच्या प्रभावाने स्वार्थ सोडून केवळ कर्तव्य भावनेने यश - अपयशाचा किंवा परिणामांचा विचार न करता मनुष्य जेव्हा काम करतो तेव्हा ते काम स्थिर बुद्धीने म्हणून उत्तम दर्जाचे होते . त्या कार्यकर्त्याला कर्तव्याचे समाधान असते व ते अक्षय असते . अशा कार्यकर्त्याला जगण्यातले मर्म समजलेले असते . जीवनाच्या क्षणभंगूरत्वावर , आत्म्याच्या अमरत्वावर , ईश्वराच्या प्रेमावर व सर्व चराचर सृष्टी ईश्वराचेच स्वरुप आहे यावर त्याची परम श्रद्धा असते . त्याच्यासाठी रोजचे कार्य ही जनसेवा म्हणजे ईश्वरसेवाच असते . म्हणून त्यात तो फलित शोधीत नसतो . गीताईने अशा कार्यकर्त्याचे १८ व्या अध्यायात पुढीलप्रमाणे यथार्थ वर्णन केले आहे .
" नि : संग निरहंकार उत्साहि धैर्यमंडित ।
फळो जळो चले ना तो कर्ता सात्विक बोलिला ॥।
( गीताई १८-२६ )
समाज कार्याच एखादे क्षेत्र निवडून त्यात जन्मभर सेवावृत्तीने काम करणाऱ्या श्री . यशवंतराव नानांसारख्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या । कार्याचे मुल्यमापनच हा श्लोक करीत आहे . माझ्या मर्यादित - जीवनातील समस्यांशी झगडत असता त्यांचे फलित काय किंबहुना या जीवनाचा अर्थ काय ? त्याचे प्राप्तव्य काय ? या प्रश्नांची उत्तरे । मार्क्स , तुकाराम , ज्ञानेश्वर यांच्या प्रकाशात शोधता शोधता मी श्रांत झालो असता निष्काम कार्यकर्त्यांच्या म्हणजे स्थितप्रज्ञ वर्णनाच्या । प्रार्थनेचे बटन लागून लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात मला । या सुखी माणसाचा सदरा सापडला . त्यामुळे माझ्या जगण्याचा मार्ग प्रशस्त झाला . मी " फळो जळो चले नासा ' झालो .
नि : संग , निरहंकार आणि त्यातही ' फळो जळो चले ना' . अशा वृत्तीच्या माणसाशी कोणत्याही बाईला संसार करणे सोपे नाही . न तुकारामच्या आणि सॉक्रेटीसाच्या बायकांचा आक्रोश याच जातीचा होता .पण आमच्या सौ लीला मामींनी हा संसार चांगला रेटला व नानांच्या करता व त्यांच्या किरता ही सुखाचा झाला . याचा सर्वांना आनंद आहे .
। । सर्वत्र सुखिन : सन्तु ।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा