मुख्य सामग्रीवर वगळा

नानासाहेब एक पुरूशोत्तम योगी(श्री.एस्.ए.बागुल,सेक्रेटरी,साने गुरूजी कथामाला संघ,चाळीसगाव)

 

गीता प्रवचनातील एका प्रवचनात विनोबाजी आपले विचार मांडतांना म्हणतात , ' ' कर्म , भक्ती , ज्ञान यांचा अलगपणा मला सहन होत नाही . काही साधकांची निष्ठा अशी असते की त्यांना फक्त कर्मच सुचते . कोणी भक्तीचा मार्ग कल्पितात व त्यावरच भर देतात . काहींचा कल ज्ञानाकडे असतो . जीवन म्हणजे केवळ कर्म , केवळ भक्ती , केवळ ज्ञान असा केवल वाद मी मानू इच्छित नाही . उलटपक्षी कर्म , भक्ती व ज्ञान यांची बेरीज असा समुच्चयवादही मला पटत नाही . आधी कर्म मग भक्ती मग ज्ञान अशा सारखा क्रमवादही मी स्वीकारत नाही . तिन्ही वस्तूंचा मेळ घालावा असा सामंजस्यवादही मला पटत नाही . मला असे अनुभवावेसे वाटते की कर्म म्हणजेच भक्ती म्हणजेच ज्ञान . एका दृष्टांताद्वारे अत्यंत मार्मिकपणे समजावतांना ते म्हणतात , ' बर्फीच्या तुकड्यातील गोडी , तिचा आकार , तिचे वजन या गोष्टी वेगवेगळ्या नाहीतच . ज्या क्षणी बर्फीचा तुकडा तोंडात टाकला त्याच क्षणी तिचा आकारही खाल्ला तिचे वजनही पचवले , तिची गोडीही चाखली . तिन्ही गोष्टी एक आहेत . बर्फीच्या कणाकणात आकार , वजन , गोडी आहे . त्याचप्रमाणे प्रत्येक कृत्य सेवामय , प्रेममय व ज्ञानमय व्हावे . जीवनातील सर्व अंगप्रत्यंगात कर्म , भक्ती , ज्ञान भरून रहावे याला म्हणतात पुरुषोत्तम योग !
     हा पुरुषोत्तम योग आदरणीय नानासाहेबांच्या जीवनात आपणास पहावयास मिळतो . त्यांच्या शब्दांच्या मागे त्याग आणि तपश्चर्येचे सामर्थ्य आहे . हृदयात गोरगरीबांविषयी अपार करुणा आहे . याची प्रत्यक्ष जाणीव ते विविध श्रमशिबिरातून स्वत : काम करीत असतांना विद्यार्थ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या समोर केलेल्या भाषणातून होते . त्यांच्या भाषणातील शब्द केवळ शब्द नसतात तर ती असतात शाश्वत जीवन सत्ये व जीवनमुल्ये , म्हणूनच त्या शब्दात परिवर्तनाचे सामर्थ्य आहे . नवनिर्मितीची शक्ती आहे . 
   निर्माल्यातून नवनिर्मिती करण्याची शक्ती , त्यातही सौंदर्य बघण्याची दृष्टी नानासाहेबांच्या ठिकाणी आहे . हातांची शक्ती आणि मनाची भक्ती यांची सांगड घालून वाया जाणाऱ्या श्रमशक्तीला त्यांनी योग्य दिशा दिली आहे . नानासाहेबांनी श्रमप्रतिष्ठेला महत्व प्राप्त करुन दिले आहे . आज राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमीटेड चाळीसगाव या शिक्षण संस्थेची जी भव्य दिव्य अशी . ज्ञानमंदिरे उभी आहेत त्याच ठिकाणी एके काळी डोक्यापर्यंत खोल नाले होते . मोठमोठाले खड्डे होते . झाडा झुडुपांनी आणि काटेरी कुरुपाटांनी वेढलेली त्यामुळे निरुपयोगी म्हणून टाकून दिलेली जमीन होती . परंतु नेहमीच श्रमदेवतेची आराधना करणाऱ्या नानासाहेबांनी जनशक्तीला आव्हान केले आणि त्यातून आज या ठिकाणी दिसणाऱ्या शारदेच्या सुंदर मंदिरांची उभारणी केली.
   हजारो गोरगरीब विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.
    शिक्षणाबरोबरच नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्रमप्रतिष्ठेचे धडेही गिरवीत आहेत . कोणतेही काम निस्वार्थपणे मनापासून करण्याची शिकवण त्यांना येथे मिळत आहे . नानासाहेबांनी आपल्या खाजगी आणि सामाजिक जीवनात गरीब , श्रीमंत , उच्च - नीच , लहान - मोठा असा भेदभाव कधीही मानला नाही . त्यांच्या घराचा दरवाजा सतत सर्वांसाठी उघडा असतो . कोणालाही आत येण्यासाठी परवानगीची गरज लागत नाही . साने गुरुजींनी सांगितलेली समानतेची ही शिकवण
    " हृदयातीलही शेती करुन । स्नेह दयेचे मळे पिकवून । समानता स्नेहाला निर्मुन । सौख्या आणू पूर । आम्ही देवाचे मजूर । आम्ही देशाचे मजूर । 
   आपल्या आचरणात आणली आहे . संस्थेत याच आचार विचारांची पेरणी केली आहे . समाजातील गोर गरीब , मागास जाती जमातींच्या लोकांनाही सन्मानाची वागणूक मिळते आहे . उद्याचे नेतृत्व मतांच्या पेटीतून नव्हे तर श्रमशक्तीतूनच वर येईल असा नानासाहेबांचा निश्वास आहे . या ठिकाणी पद्भविभूषण महामानव बाबा आमटे यांनी लिहीलेल्या कवितेतील ओळी नानासाहेबांनी सार्थ केल्याचे दिसते .
 " येथे नांदतात श्रमर्षी , या भूमीला क्षरण नाही 
 येथे ज्ञान गाळते घाम , विज्ञान दानव शरण नाही,
येथे कला जीवनमय,अर्थाला अपहरण नाही
येथे भविष्य जन्मत आहे ,या सीमांना मरण नाही.
   राष्ट्रपिता महात्मा गांधी , पूज्य विनोबाजी , साने गुरुजी आणि चुलते कै . हरिभाऊ चव्हाण ही नानासाहेबांची श्रद्धास्थाने आहेत . त्यामुळे सत्तेपेक्षा शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे महत्वपूर्ण साधन बनू शकेल ह्यावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे जाळे विणले . आज या संस्थेचा अतिशय सुंदर असा डौलदार आम्रवृक्ष डोलतांना दिसत आहे . अर्थातच हा वृक्ष लावण्याचे व त्याला निकोपपणे वाढविण्याचे मोठे श्रेय आदरणीय नानासाहेबांनाच आहे . 
   असे हे अत्यंत मितभाषी , कर्मवीर नानासाहेब ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत . त्यानिमित्ताने त्यांचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. यापुढेही नानासाहेबांच्या हातून अशीच भव्य समाजपयोगी कामे होत राहोत . त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभून त्यांच्या वयाच्या 100 वर्षा नंतर त्यांचा हिरक महोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळो हिच प्रभुचरणी प्रार्थना करतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...