जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेची जाणावा।।१ ।।
श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या या अभंगात सांगितल्याप्रमाणे दुःखी , दीन , पिडीत , गोरगरिबांना आपले म्हणून त्यांना आपलेसे करुन त्यांचे दुःख दूर करुन , त्यांना प्रेम देवून , समाजात त्यांची घडी बसवितात , सुख देतात अशा महान पुरुषांच्या ठिकाणी संतांची लक्षणे दिसतात . आणि म्हणूनच ते ऋषीतुल्य , देवतुल्य वाटतात . अशा विचारांच्या , आचारांच्या नव्हे प्रत्यक्ष कृतिशिल ऋषीतुल्य असणारे आमच्या संस्थेचे जन्मदाते नानासाहेब तथा य . ना . चव्हाण हे आपल्या जीवनातील सुखदु : खाचे , कष्टमय अशा यशस्वी तपश्चर्येचे ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत आणि म्हणूनच आज त्यांचा ७५ वा ' अमृतमहोत्सवी ' वाढदिवस साजरा करतांना आनंद द्विगुणीत होत आहे .
आज दिनांक ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी आदरणीय नानासाहेबांचा अमृतमहोत्सव सोहळा राष्ट्रीय महाविद्यालयाच्या भव्य , दिव्य प्रागंणावर साजरा होत आहे . शिक्षण क्षेत्रातील थोर शिक्षणमहर्षि , समाजसेवक , आदर्श विचारवंत , कर्मयोगी असलेल्या सत्पुरुषांचा होणारा हा गौरव किंवा सत्कार !
जसे आपण सूर्यनारायणास अर्ध्य म्हणून गंगेत उभे राहून ओंजळभर पाणी वाहतो , ते पाणी त्या प्रकाशकापर्यंत कधिच पोहचत नाही , पोहचावं अशी अपेक्षाही नसते . परंतु आपण त्यात आपली भावना , आपलं त्या जीवनदात्या , अंधकार नष्ट करून जीवनास प्रकाश देणारया सूर्यावरचं प्रेम प्रकट करीत असतो तसेच शब्दरूपी अर्घ्य मा.नानांच्या कार्यास .
मानवी जीवनात देखील चालताना , बोलताना , जीवनाचे व्यवहार नियंत्रीत करतांना ज्या मुलभूत अशा काही भावना आपण एकमेकांबद्दल प्रकट करतो , त्यात एखाद्या महापुरुषाने आपल्यावर केलेल्या प्रेमाची , मदतीची , सहकार्याबद्दलची आपण जेव्हा प्रेमभावना प्रकट करतो , तीचे नाव आहे कृतज्ञता . जेथे कृतज्ञता नाही तेथे मानवता संपते . संस्कृती संपते आणि म्हणूनच !
ज्या नानासाहेबांनी आम्हाला खुप काही दिलं . त्यान आम्हाला ज्ञानाची कवाडे उघडी झाली , सुसंस्कृत अस जीवन प्राप्त झालं , संसार बहरले , खेडी सुधारली , ज्ञानाची गंगोत्री खेड्यापर्यत पोहोचली . हजारो - लाखोंना जीवनाची दिशा मिळाली , जीवनानाला शिस्तबध्द गती मिळाली असे अनेकांचे जीवन सुखीकरणारया ज्यांनी खेड्यात जन्म घेवून , खेड्यातून शहरात आणि शहरातून खेड्यात सर्वांसाठी शिक्षणप्रसाराचे महान असे कार्य केले.ते सर्व विद्यार्थी , शेतकरी , सहकारी , कर्मचारी ( यांच्या वतीने ) आम्ही सर्वजण माननीय नानासाहेबांचे ऋणी आहोत .त्याचे ऋण म्हणून, च्यावरील प्रेमाची भावना म्हणून , कृतज्ञता म्हणून , आम्ही हा " अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत . हा सत्कार ! प्रेमाचा , सत्पुरुषाचा , सत्गुरुचा , सत् विचारांचा आणि माणुसकीचा सत्कार आहे .
आपण सर्व जाणतो की , माणसाचे व्यक्तिमत्व हे अनेक बरया वाईट अनुभवांच्या संस्कारांच्या आडव्या - उभ्या धाग्यांपासून तयार होते . जीवनात आलेल्या अनेक संघर्ष , गरीबी , कष्ट व कष्टमय चळवळी , तुरुंगवास , आर्थिक ओढाताण या सर्वांतून तावून सुलाखून निघालेल्या या व्यक्तिमत्वाचा सत्कार होतांना विशेष आनंद होत आहे . परंतु आदरणीय नानासाहेबांचा सेवाभावी स्वभाव , स्वत:चा मान - सन्मानन; न वाढविण्याचा मनाचा मोठेपणा फक्त कर्म करीत राहावे अशी भावना त्यांचे ठिकाणी नेहमी असते . या सोहळ्याने त्यांना नक्कीच अवघडल्यासारखे होत असेल . सुख - दुःखाने भारावलेल्या त्यांच्या मनात सारखे शब्द घोळत असतील की ,
मज पामराशी काय थोरपण ।
पायीची वहाण पायी बरी ।
एका सर्वसामान्य गरीब , कष्टाळू प्रामाणिक , सुसंस्कृत , धार्मिक स्वभावाच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सन्माननीय नानासाहेबांची जीवनाची वाटचाल ही खरोखर काटेरी होती . परंतु तिला संस्कार , धार्मिकता , सृजनशिलता , अध्यात्मता , अशा सद्गुणांचा सुगंध होता . म्हणूनच त्यांनी उच्चशिक्षणापर्यंत मजल मारली . गरीबीच्या जीवनातले अल्पसे शैक्षणिक अनुभव मी स्वतः अनुभवले आहेत . म्हणून सांगतो की , आपला उदरनिर्वाह व शैक्षणिक खर्च स्वतः भागवून कष्ट करून शिक्षण घेणे किती कठीण गोष्ट असते . आणि तरी गुलामगिरीत , पारतंत्र्यात पूर्ण करतांना दुर्दम्य अशा ध्येयवादातून , स्वातंत्र्य चळवळीत भाग घेवून स्वत : बरोबर इतरांच्या विकासासाठी समर्थांच्या विचारांप्रमाणे बाहेर पडण्यासाठी , वैचारिक व सामाजिक क्रांतीसाठी " सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जे करील तयांचे' या मंत्राचा अंगिकार करुन समाज परिवर्तनासाठी व प्रबोधनासाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाटी वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी नोकरी , प्रपंच सांभाळून नानासाहेबांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . ' ची डिसेंबर १ ९ ५३ मध्ये स्थापना केली आणि हा ! हा ! म्हणता त्या वसतीगृह बी रूपी रोपटाचे , आज विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे . हजारो विद्यार्थी , त्यात ज्ञान घेत आहेत . सुंदर , भव्य इमारती ज्या श्रमतागातूवन , आत्मियतेतून उभारल्या गेल्या त्या ज्ञानाची मंदिर बनून डौलाने उभ्या आहेत . पुष्कळदा आपण असं बघतो की , समाजसेवक , राजकारणी विचारवंत हे बोलण्यात आणि कृतीत भिन्न असतात . परंतू याला मात्र आमचे नानासाहेब पूर्ण आपवाद आहेत . कारण ते कृतीत आणि वागण्यात एकच आहेत . याचे खरे प्रत्यंतर म्हणजे त्यांच्या विश्वासपूर्वक आणि तळमळीने , आत्मियतेने वागण्यात्या वृत्ती मुळे आज ते संस्थेच्या स्थापनेपासून ते आजमितीपर्यंत सतत प्रमुख पदाधिकारी म्हणून राहीले आहेत. त्यांच्या सहकार्यांनी त्याचार पूर्ण विश्वास टाकलेला आहे . व त्यामुळे ते अजात शत्रु बनलेले आहेत . म्हणून अशा थोर समाज सेवकास त्यांच्या कार्यात शाक्ति ,सामर्थ्य , दीर्घायुष्य आयुरारोग्य मिळो अशी परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना ! असे सर्वगुणसंपत्र , विचारवंत , तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते उत्तर प्रशासक , शिक्षणमहर्षी थोर संताला त्यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार प्रसंगी अत्यंत नम्रपणे अभिवादन करताना , नकळत ओटावर शब्द ओघळतात , " दिव्यत्वाची जेथे प्रचिती ! तो कर माझे जुळती ।!!
***
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा