मुख्य सामग्रीवर वगळा

निश्चयाचा महामेरू नानासाहेब (श्री.विलास भिकनराव मोरे,राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव)

 

    जे का रंजले गांजले । 

त्यासी म्हणे जो आपुले ॥

 तोचि साधू ओळखावा ।

 देव तेथेची जाणावा।।१ ।।

 श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या या अभंगात सांगितल्याप्रमाणे दुःखी , दीन , पिडीत , गोरगरिबांना आपले म्हणून त्यांना आपलेसे करुन त्यांचे दुःख दूर करुन , त्यांना प्रेम देवून , समाजात त्यांची घडी बसवितात , सुख देतात अशा महान पुरुषांच्या ठिकाणी संतांची लक्षणे दिसतात . आणि म्हणूनच ते ऋषीतुल्य , देवतुल्य वाटतात . अशा विचारांच्या , आचारांच्या नव्हे प्रत्यक्ष कृतिशिल ऋषीतुल्य असणारे आमच्या संस्थेचे जन्मदाते नानासाहेब तथा य . ना . चव्हाण हे आपल्या जीवनातील सुखदु : खाचे , कष्टमय अशा यशस्वी तपश्चर्येचे ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत आणि म्हणूनच आज त्यांचा ७५ वा ' अमृतमहोत्सवी ' वाढदिवस साजरा करतांना आनंद द्विगुणीत होत आहे . 

  आज दिनांक ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी आदरणीय नानासाहेबांचा अमृतमहोत्सव सोहळा राष्ट्रीय महाविद्यालयाच्या भव्य , दिव्य प्रागंणावर साजरा होत आहे . शिक्षण क्षेत्रातील थोर शिक्षणमहर्षि , समाजसेवक , आदर्श विचारवंत , कर्मयोगी असलेल्या सत्पुरुषांचा होणारा हा गौरव किंवा सत्कार !

    जसे आपण सूर्यनारायणास अर्ध्य म्हणून गंगेत उभे राहून  ओंजळभर पाणी वाहतो , ते पाणी त्या प्रकाशकापर्यंत कधिच पोहचत  नाही , पोहचावं अशी अपेक्षाही नसते . परंतु आपण त्यात आपली   भावना , आपलं त्या जीवनदात्या , अंधकार नष्ट करून जीवनास प्रकाश देणारया सूर्यावरचं  प्रेम प्रकट करीत असतो  तसेच शब्दरूपी अर्घ्य मा.नानांच्या कार्यास    .

   मानवी जीवनात देखील चालताना , बोलताना , जीवनाचे व्यवहार नियंत्रीत करतांना ज्या मुलभूत अशा काही भावना आपण एकमेकांबद्दल प्रकट करतो , त्यात एखाद्या महापुरुषाने आपल्यावर केलेल्या प्रेमाची , मदतीची , सहकार्याबद्दलची आपण जेव्हा प्रेमभावना  प्रकट करतो , तीचे नाव आहे कृतज्ञता . जेथे कृतज्ञता नाही तेथे  मानवता संपते . संस्कृती संपते आणि म्हणूनच !

    ज्या नानासाहेबांनी आम्हाला खुप काही दिलं . त्यान आम्हाला ज्ञानाची कवाडे उघडी झाली , सुसंस्कृत अस जीवन प्राप्त झालं , संसार बहरले , खेडी सुधारली , ज्ञानाची गंगोत्री खेड्यापर्यत पोहोचली . हजारो - लाखोंना जीवनाची दिशा मिळाली , जीवनानाला शिस्तबध्द गती मिळाली असे अनेकांचे जीवन सुखीकरणारया ज्यांनी  खेड्यात जन्म घेवून , खेड्यातून शहरात आणि शहरातून खेड्यात सर्वांसाठी शिक्षणप्रसाराचे महान असे कार्य केले.ते सर्व विद्यार्थी , शेतकरी , सहकारी , कर्मचारी ( यांच्या वतीने ) आम्ही सर्वजण माननीय नानासाहेबांचे ऋणी आहोत .त्याचे ऋण म्हणून, च्यावरील प्रेमाची भावना म्हणून , कृतज्ञता म्हणून , आम्ही हा " अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत . हा सत्कार ! प्रेमाचा , सत्पुरुषाचा , सत्गुरुचा , सत् विचारांचा आणि माणुसकीचा सत्कार आहे .

 आपण सर्व जाणतो की , माणसाचे व्यक्तिमत्व हे अनेक बरया  वाईट अनुभवांच्या संस्कारांच्या आडव्या - उभ्या धाग्यांपासून तयार होते . जीवनात आलेल्या अनेक संघर्ष , गरीबी , कष्ट व कष्टमय चळवळी , तुरुंगवास , आर्थिक ओढाताण या सर्वांतून तावून सुलाखून निघालेल्या या व्यक्तिमत्वाचा सत्कार होतांना विशेष आनंद होत आहे . परंतु आदरणीय नानासाहेबांचा सेवाभावी स्वभाव , स्वत:चा मान - सन्मानन; न वाढविण्याचा मनाचा मोठेपणा फक्त कर्म करीत राहावे  अशी भावना त्यांचे ठिकाणी नेहमी असते . या सोहळ्याने त्यांना नक्कीच अवघडल्यासारखे होत असेल . सुख - दुःखाने भारावलेल्या त्यांच्या मनात सारखे शब्द घोळत असतील की , 

मज पामराशी काय थोरपण । 

पायीची वहाण पायी बरी ।  

  एका सर्वसामान्य गरीब , कष्टाळू प्रामाणिक , सुसंस्कृत , धार्मिक स्वभावाच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सन्माननीय नानासाहेबांची जीवनाची वाटचाल ही खरोखर काटेरी होती . परंतु तिला संस्कार , धार्मिकता , सृजनशिलता , अध्यात्मता , अशा सद्गुणांचा सुगंध होता . म्हणूनच त्यांनी उच्चशिक्षणापर्यंत मजल मारली . गरीबीच्या जीवनातले अल्पसे शैक्षणिक अनुभव मी स्वतः अनुभवले आहेत . म्हणून सांगतो की , आपला उदरनिर्वाह व शैक्षणिक खर्च स्वतः भागवून कष्ट करून शिक्षण घेणे किती कठीण गोष्ट असते . आणि तरी गुलामगिरीत , पारतंत्र्यात पूर्ण करतांना दुर्दम्य अशा ध्येयवादातून , स्वातंत्र्य चळवळीत भाग घेवून स्वत : बरोबर इतरांच्या विकासासाठी समर्थांच्या विचारांप्रमाणे बाहेर पडण्यासाठी , वैचारिक व सामाजिक  क्रांतीसाठी " सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जे करील तयांचे'   या मंत्राचा अंगिकार करुन समाज परिवर्तनासाठी व प्रबोधनासाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाटी वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी नोकरी , प्रपंच सांभाळून नानासाहेबांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . ' ची डिसेंबर १ ९ ५३ मध्ये स्थापना केली आणि हा ! हा ! म्हणता त्या वसतीगृह बी रूपी रोपटाचे , आज विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे . हजारो विद्यार्थी , त्यात ज्ञान घेत आहेत . सुंदर , भव्य इमारती ज्या श्रमतागातूवन , आत्मियतेतून उभारल्या गेल्या त्या ज्ञानाची मंदिर बनून डौलाने उभ्या आहेत .      पुष्कळदा आपण असं बघतो की , समाजसेवक , राजकारणी विचारवंत हे बोलण्यात आणि कृतीत भिन्न असतात . परंतू  याला मात्र आमचे नानासाहेब पूर्ण आपवाद आहेत . कारण ते कृतीत आणि वागण्यात एकच आहेत . याचे खरे प्रत्यंतर म्हणजे त्यांच्या विश्वासपूर्वक आणि तळमळीने , आत्मियतेने वागण्यात्या वृत्ती मुळे आज ते संस्थेच्या स्थापनेपासून ते आजमितीपर्यंत  सतत प्रमुख पदाधिकारी म्हणून राहीले आहेत. त्यांच्या सहकार्यांनी त्याचार पूर्ण विश्वास टाकलेला आहे . व त्यामुळे ते अजात शत्रु बनलेले आहेत . म्हणून अशा थोर समाज सेवकास त्यांच्या कार्यात शाक्ति ,सामर्थ्य , दीर्घायुष्य आयुरारोग्य मिळो अशी परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना  ! असे सर्वगुणसंपत्र , विचारवंत , तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते उत्तर प्रशासक , शिक्षणमहर्षी थोर संताला त्यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार प्रसंगी अत्यंत नम्रपणे अभिवादन करताना , नकळत ओटावर शब्द ओघळतात , " दिव्यत्वाची जेथे प्रचिती ! तो कर माझे जुळती ।!!

       ***

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...