मुख्य सामग्रीवर वगळा

जनी जनार्दन(प्रा.आर,.पी.निकम,राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव


 नासाहेबांबद्दल काय आणि किती लिहावं . त्यांचे संपूर्ण जीवन तर कारूण्याचा व कर्तृत्वाचा अथांग  सागर आहे . नानासाहेबामध्ये गुंतावला व समर्पित व्हायला मला खूप आवडते . तासनतास नानासाहेबांची कनवाळू मूर्ती बघायला व सश्रद्ध पुजायलाही आवडते . " बहुजन हिताय " हा नानासाहेबांचा शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रमुख ध्येयवाद आहे . हा माझ्यासारख्या अनेक गरीब , होतकरू व मागास जाती जमातीतील लोकांना , गुरुजनाना व विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा मार्ग दाखवितो . आपल्या राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळामार्फत नानासाहेबांनी समाजातील विषमता व अज्ञान यथाशक्ती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे . शिक्षणाचा ग्रामीण भागात केलेल्या प्रसारामुळे मुलींना आपला विकास करण्याची सुवर्णसंधी मिळाली .

    नानासाहेबांची दृष्टी तळागाळातील वर्गाचा वेध घेणारी व भारतीय संस्कृतीचा शोध घेणारी आहे . अनेक अडचणींचे , संकटांच डोंगर सहज चिरणारा हा योद्धा गर्वाने , मीपणाने , स्तुतीसुमनांनी कधी भारावला नाही . सातत्याने सत्याची कास , सातत्याने घडपड , चिंतन , स्वत : साठी नाही , कुटुंबासाठी नाही तर जनतेच्या भल्यासाठी . संताचे हृदय लाभल्यामुळे जनतेमध्ये खरा जनार्दन दडलेला आहे . तो कोणत्याही देव्हाऱ्यात नाही , मंदिरात नाही की गिरीकपारीत नाही हे नानासाहेबांना समजू शकले व त्याप्रमाणे ' त्यागमय ' सेवाभावी आयुष्य ते आजपर्यंत जगले व पुढेही जगतील . नानासाहेबां व्यक्तीमत्वाचे खरे दर्शन मला या तुकारामाच्या अंभगात झाले .       सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा ।

  न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥१ ॥ 

- सत्यवादी करी संसार सकल । 

अलिप्त कमळ जळी जैसे ॥२ ॥

 - घडे ज्या उपकार भूतांची ते दया ।

 आत्मस्थिती तया अंगी वसे ॥३ ॥

 न बोले गुण - दोष नाइके जो कानी ।

 वर्तोनि तो जनी जनार्दन ॥४ ॥

 तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । 

पावो करिता शीण सांडी-मांडी||5||

ज्याने सर्वस्वाचा त्याग केला तो नेहमी सोवळा आहे.हे जे तुकाराम म्हणतात तसेच आमचे नानासाहेब  सुध्दा सोवळे आहेत .   ' हे सोड ते जोड ' या गोष्टींच्या नादी न लागता सतत पन्नास वर्ष एकाच ध्येय कार्यात सर्वस्वी त्यांनी झोकून दिले . ' मनुष्य पुष्कळ वेळा कार्याचे नावाखाली आपल्या देहासंबंधी फार स्वार्थी विचार करतो . ज्याने त्याने आपल्या हृदयस्थ परमेश्वरास शरण जाऊन  आपली भुमिका ठरवावी.आपण लोक मरणाची गोष्ट निघाली की फार बारकाईने हिशेब ठेवू लागतो.पण जेथे एकाचे बलिदान हजारांचे अंत:करणात कार्याची स्फूर्ती आणते तेथे इतर बारीकसारीक हिशेब ठेवण्याची जरूरी नसते. गीतेची सुरूवातच देहमायाभंगापासून झालेली आहे.

 मरण दाटे अमित्र जोवरी 

     आत्मोद्धार अशक्य तोवरी

 देह न टाकवे जीर्णवस्त्रा परी

    आत्मविचारी टोणपा तो ||

 नानासाहेबांच्या व्यक्ती विशेष कंगोरयाचा शोध घेतल्यास खरोखरच अहंकाररहीत नम्र जीवनाची उपासना करतांना ते दिसतात. एखाद्या गरीबाच्या, सामान्याच्या घरात जाऊन आस्थेने विचारपूस करणारे नानासाहेब मी रोजच पहातो . हे तुमच्या आमच्या सारख्या पांढरपेशा वेशातील लोकांनाही जमू शकणार नाही . इतका  मीपणा,दंभ आम्हाला चिकटलेलाअसतो. 

  नानासाहेब तुम्ही म्हणजे वाळवंटातील हिरवळ आहात. तरूणांचे  आशास्थान आहात. भावी पिढीचे  दैवत आहात. तुमच्या अंत : करणातील विशाल गुढ तर आम्ही जाणू शकत नाही . पण त्याची कल्पना तरी करु शकतो . ती अशी

    मी प्रवासाला निघालोय

 रिकाम्या हातानं , पण

आकांक्षांनी भरलेल्या मनानं

 वाटेवर भिडतील अनंत संकटे

 हा अनंताचा प्रवास मात्र

  सुरुच राहील निर्भिड मनानं .

 असा हा तुमचा प्रवास आहे . परमेश्वर तुमच्या ह्या निर्भिड प्रवासात कोणताच खंड पडणार नाही अशी सदिच्छा ! भावपूर्ण अंत : करणानी या अमृतमहोत्सवी व्यक्त करतो . तुम्हाला दीर्घायुरारोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...