कर्मवीर नानांच्याअसंख्य सदगुणी चाहत्यांनो आणि भगिनींनो,
सात जानेवारी हा आपल्या नानांचा जन्मदिन.पाहता पाहता सात दशक अधिक पाच वर्षे कशी धावत गेली पत्ताच लागला नाही.कोणी सांगे पहा ना याला मी पाळण्यात पहुडतानां पाहिले, कोणी म्हणे शाळेत लगबगीने दौडताना न्याहळले,कोणी पुसे हाच का तो यशवंता.अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत देत एवढ्या मोठ्या पदाला पोहोचला तर असंख्य साधी भोळी,भोळी भाबडी ,रानावनात भटकणारे ,अन्नाविना तडफडणारी बालके डोळ्यात आसवे दाटून हात जोडून म्हणतील," हा आमचा मायबाप" यांनीच आम्हाला बोटे धरून मायाने आणलं, शिकवलं ,वाढवलं मानाने जगण्याचा मार्ग दाखविला.आम्ही आमच्या या मायबापाला कसं विसरू?
ती पाहा' घर घर में दिवाली है ,मेरे घर में अंधेरे'अशा अवस्थेतली अंध बालके एका व्रतधारी खादीतल्या माणसाच्या अंगाला स्पर्श करताच 'आमचे नाना -नाना आमचे'असे नुसत्या स्पशाने ओळखुन त्यांच्या सहवासाचा आनंद व्यक्त करतील व मनी म्हणतील 'यांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं ,आम्हाला ज्ञानाचा प्रकाश दिला स्वाभिमान शिकवला जोहार मायबाप जोहार'
त्यांच्या अवतीभवती सातत्याने बागडणारी शिक्षक ,कार्यकर्ते ,संचालक आदी बडी बडी वडीलधारी मंडळी म्हणतील,' यांची किमया आगाध आहे, हा खरा कर्मवीर आहे ,बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीने आम्हाला मार्ग दाखवीतो,अत्यंत
निगर्वी परंतु तितका निग्रही व आग्रही असल्याने कामाचा प्रचंड डोंगर उपसतो व आमलातही आणतो.आम्ही प्रथम भांबावतो,अशक्य अशक्य अशा शंका व्यक्त करतो परंतु या सर्व संकल्पना प्रत्यक्षात अवतरलेल्या पाहताच विनम्रपणे त्याच्यातल्या शिल्पकाराला अभिवादन करतो.'
असे विविध पैलूनीं साकारलेले तरीही अपुरे असलेले असे नानांचे,त्यांच्या जीवन कार्याचे,त्यांच्या स्वप्न पूर्तीचे,त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे ओझरते दर्शन त्यांच्याअमृतमहोत्सवी गौरव समारंभाप्रित्यर्थ प्रकाशित होणारया या गौरवग्रथांत आपणास पाहावयास मिळेल.
या गौरवग्रथांस प्रस्तावना लिहावी अशी माझ्या शिक्षक मित्रांनी मला विनंती केली.नानांचे व माझे शतजन्मीचे नाते असावे अशीच त्यांची धारणा असल्याने त्यांनी मला ही गळ घातली.मला तर माझा हा बहुमान वाटला.परंतु मित्रांनो,मी त्याला पात्र नाही असे मला सारखे वाटायचे.कोठे यशवंतनाना आणि कोठे मी!त्यांची ती विनम्र वृत्ती,तो निगर्वी स्वभाव,तो करारी बाणा,प्रसिध्दी पराडमुखता,सतत कामाचा ध्यास व त्यासाठी झपाटून पाठलाग करण्याची प्रवृत्ती पाहून खरया अर्थाने' दिव्यत्वाची जेथे प्रचीति तेथे कर माझे जुळती' हीच माझ्या मनीचा भावना झाली आणि माझ्या ह्रदयीच्या तळमळीतून वयाने माझा पाठलाग करणारया नानांना शुभेच्छा चिंतित त्यांनी ज्या ज्या संकल्पना मनातील खोल कप्प्यात अंकुरल्या असतील त्या त्या सर्व पुलकीत व्हाव्यात व त्या विस्तारलेल्या कार्यशाखेच्या शीतल छायेत असंख्य पांथस्थांना निर्मळ कार्य करण्याची पिढ्यान पिढ्या प्रेरणा मिळत राहावी हीच सद्भावना व्यक्त करतो. हा गौरव ग्रथं नसून सौरभ ग्रंथ आहे.याला नांनाचा मंगल विचार ,आचार आणि अनेकांच्या प्रचाराचा सुगंध लाभला असल्याने असा सौरभ ग्रंथ सर्वांना हवाहवासा वाटावा, त्यातून प्रत्येक लेख व प्रसंग प्रेरणादायी ठरावे व या सौरभाचा सुगंध सतत दरवळत राहावा हीच या शब्दसुमनांच्या द्वारे नानांच्या कार्यरत चरणी अर्पण करून 'जीवेत शरद:शतम्' अशी प्रभुचरणी प्रार्थना करून माझ्या लेखणीला आराम देतो.जयहिंद!
प्रकाशभाई मोहाडीकर
संस्थापक
अखिल भारतीय साने गुरूजी
कथामाला,मुंबई
सात जानेवारी हा आपल्या नानांचा जन्मदिन.पाहता पाहता सात दशक अधिक पाच वर्षे कशी धावत गेली पत्ताच लागला नाही.कोणी सांगे पहा ना याला मी पाळण्यात पहुडतानां पाहिले, कोणी म्हणे शाळेत लगबगीने दौडताना न्याहळले,कोणी पुसे हाच का तो यशवंता.अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत देत एवढ्या मोठ्या पदाला पोहोचला तर असंख्य साधी भोळी,भोळी भाबडी ,रानावनात भटकणारे ,अन्नाविना तडफडणारी बालके डोळ्यात आसवे दाटून हात जोडून म्हणतील," हा आमचा मायबाप" यांनीच आम्हाला बोटे धरून मायाने आणलं, शिकवलं ,वाढवलं मानाने जगण्याचा मार्ग दाखविला.आम्ही आमच्या या मायबापाला कसं विसरू?
ती पाहा' घर घर में दिवाली है ,मेरे घर में अंधेरे'अशा अवस्थेतली अंध बालके एका व्रतधारी खादीतल्या माणसाच्या अंगाला स्पर्श करताच 'आमचे नाना -नाना आमचे'असे नुसत्या स्पशाने ओळखुन त्यांच्या सहवासाचा आनंद व्यक्त करतील व मनी म्हणतील 'यांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं ,आम्हाला ज्ञानाचा प्रकाश दिला स्वाभिमान शिकवला जोहार मायबाप जोहार'
त्यांच्या अवतीभवती सातत्याने बागडणारी शिक्षक ,कार्यकर्ते ,संचालक आदी बडी बडी वडीलधारी मंडळी म्हणतील,' यांची किमया आगाध आहे, हा खरा कर्मवीर आहे ,बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीने आम्हाला मार्ग दाखवीतो,अत्यंत
निगर्वी परंतु तितका निग्रही व आग्रही असल्याने कामाचा प्रचंड डोंगर उपसतो व आमलातही आणतो.आम्ही प्रथम भांबावतो,अशक्य अशक्य अशा शंका व्यक्त करतो परंतु या सर्व संकल्पना प्रत्यक्षात अवतरलेल्या पाहताच विनम्रपणे त्याच्यातल्या शिल्पकाराला अभिवादन करतो.'
असे विविध पैलूनीं साकारलेले तरीही अपुरे असलेले असे नानांचे,त्यांच्या जीवन कार्याचे,त्यांच्या स्वप्न पूर्तीचे,त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे ओझरते दर्शन त्यांच्याअमृतमहोत्सवी गौरव समारंभाप्रित्यर्थ प्रकाशित होणारया या गौरवग्रथांत आपणास पाहावयास मिळेल.
या गौरवग्रथांस प्रस्तावना लिहावी अशी माझ्या शिक्षक मित्रांनी मला विनंती केली.नानांचे व माझे शतजन्मीचे नाते असावे अशीच त्यांची धारणा असल्याने त्यांनी मला ही गळ घातली.मला तर माझा हा बहुमान वाटला.परंतु मित्रांनो,मी त्याला पात्र नाही असे मला सारखे वाटायचे.कोठे यशवंतनाना आणि कोठे मी!त्यांची ती विनम्र वृत्ती,तो निगर्वी स्वभाव,तो करारी बाणा,प्रसिध्दी पराडमुखता,सतत कामाचा ध्यास व त्यासाठी झपाटून पाठलाग करण्याची प्रवृत्ती पाहून खरया अर्थाने' दिव्यत्वाची जेथे प्रचीति तेथे कर माझे जुळती' हीच माझ्या मनीचा भावना झाली आणि माझ्या ह्रदयीच्या तळमळीतून वयाने माझा पाठलाग करणारया नानांना शुभेच्छा चिंतित त्यांनी ज्या ज्या संकल्पना मनातील खोल कप्प्यात अंकुरल्या असतील त्या त्या सर्व पुलकीत व्हाव्यात व त्या विस्तारलेल्या कार्यशाखेच्या शीतल छायेत असंख्य पांथस्थांना निर्मळ कार्य करण्याची पिढ्यान पिढ्या प्रेरणा मिळत राहावी हीच सद्भावना व्यक्त करतो. हा गौरव ग्रथं नसून सौरभ ग्रंथ आहे.याला नांनाचा मंगल विचार ,आचार आणि अनेकांच्या प्रचाराचा सुगंध लाभला असल्याने असा सौरभ ग्रंथ सर्वांना हवाहवासा वाटावा, त्यातून प्रत्येक लेख व प्रसंग प्रेरणादायी ठरावे व या सौरभाचा सुगंध सतत दरवळत राहावा हीच या शब्दसुमनांच्या द्वारे नानांच्या कार्यरत चरणी अर्पण करून 'जीवेत शरद:शतम्' अशी प्रभुचरणी प्रार्थना करून माझ्या लेखणीला आराम देतो.जयहिंद!
प्रकाशभाई मोहाडीकर
संस्थापक
अखिल भारतीय साने गुरूजी
कथामाला,मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा