मुख्य सामग्रीवर वगळा

गौरव नव्हे सौरभ ग्रंथ( प्रकाशभाई मोहाडीकर,संस्थापक,"अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला,मुबंई)

 कर्मवीर नानांच्याअसंख्य सदगुणी  चाहत्यांनो आणि भगिनींनो,
  सात जानेवारी हा आपल्या नानांचा जन्मदिन.पाहता पाहता सात दशक अधिक पाच वर्षे कशी धावत गेली पत्ताच लागला नाही.कोणी सांगे पहा ना याला मी पाळण्यात पहुडतानां पाहिले, कोणी म्हणे शाळेत लगबगीने दौडताना न्याहळले,कोणी पुसे हाच का तो यशवंता.अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत देत एवढ्या मोठ्या पदाला पोहोचला तर असंख्य साधी भोळी,भोळी भाबडी ,रानावनात भटकणारे ,अन्नाविना तडफडणारी बालके डोळ्यात आसवे दाटून हात जोडून म्हणतील," हा आमचा मायबाप" यांनीच आम्हाला बोटे धरून मायाने आणलं, शिकवलं ,वाढवलं मानाने जगण्याचा मार्ग दाखविला.आम्ही आमच्या या मायबापाला कसं विसरू?
 ती पाहा' घर घर में दिवाली है ,मेरे घर में अंधेरे'अशा अवस्थेतली अंध बालके एका व्रतधारी खादीतल्या  माणसाच्या अंगाला स्पर्श करताच 'आमचे नाना -नाना आमचे'असे नुसत्या स्पशाने ओळखुन  त्यांच्या सहवासाचा आनंद व्यक्त करतील व मनी म्हणतील 'यांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं ,आम्हाला ज्ञानाचा प्रकाश दिला स्वाभिमान शिकवला जोहार मायबाप जोहार'
        त्यांच्या अवतीभवती सातत्याने बागडणारी शिक्षक ,कार्यकर्ते ,संचालक आदी बडी बडी वडीलधारी मंडळी म्हणतील,' यांची किमया आगाध आहे, हा खरा कर्मवीर आहे ,बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीने आम्हाला मार्ग दाखवीतो,अत्यंत
निगर्वी परंतु तितका निग्रही व आग्रही असल्याने कामाचा प्रचंड डोंगर उपसतो व आमलातही आणतो.आम्ही प्रथम भांबावतो,अशक्य अशक्य अशा शंका व्यक्त करतो परंतु या सर्व संकल्पना प्रत्यक्षात अवतरलेल्या पाहताच विनम्रपणे त्याच्यातल्या शिल्पकाराला अभिवादन करतो.'
  असे विविध पैलूनीं साकारलेले तरीही अपुरे असलेले असे नानांचे,त्यांच्या जीवन कार्याचे,त्यांच्या स्वप्न पूर्तीचे,त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे ओझरते दर्शन त्यांच्याअमृतमहोत्सवी गौरव समारंभाप्रित्यर्थ प्रकाशित होणारया या गौरवग्रथांत आपणास पाहावयास मिळेल.
      या गौरवग्रथांस प्रस्तावना लिहावी अशी माझ्या शिक्षक मित्रांनी मला विनंती केली.नानांचे व माझे शतजन्मीचे नाते असावे अशीच त्यांची धारणा असल्याने त्यांनी मला ही गळ घातली.मला तर माझा हा बहुमान वाटला.परंतु मित्रांनो,मी त्याला पात्र नाही असे मला सारखे वाटायचे.कोठे यशवंतनाना आणि कोठे मी!त्यांची ती विनम्र वृत्ती,तो निगर्वी स्वभाव,तो करारी बाणा,प्रसिध्दी पराडमुखता,सतत कामाचा ध्यास व त्यासाठी झपाटून पाठलाग करण्याची प्रवृत्ती पाहून खरया अर्थाने' दिव्यत्वाची जेथे प्रचीति तेथे कर माझे जुळती' हीच माझ्या मनीचा भावना झाली आणि माझ्या ह्रदयीच्या तळमळीतून वयाने माझा पाठलाग करणारया नानांना शुभेच्छा चिंतित त्यांनी ज्या ज्या संकल्पना मनातील खोल कप्प्यात अंकुरल्या असतील त्या त्या सर्व पुलकीत व्हाव्यात व त्या विस्तारलेल्या कार्यशाखेच्या शीतल छायेत असंख्य पांथस्थांना निर्मळ कार्य करण्याची पिढ्यान पिढ्या प्रेरणा मिळत राहावी हीच सद्भावना व्यक्त करतो.                                                हा गौरव ग्रथं नसून सौरभ ग्रंथ आहे.याला नांनाचा मंगल विचार ,आचार आणि अनेकांच्या प्रचाराचा सुगंध लाभला असल्याने असा सौरभ ग्रंथ सर्वांना हवाहवासा वाटावा, त्यातून प्रत्येक लेख व प्रसंग प्रेरणादायी ठरावे व या सौरभाचा सुगंध सतत दरवळत राहावा हीच या शब्दसुमनांच्या द्वारे नानांच्या कार्यरत चरणी अर्पण करून 'जीवेत शरद:शतम्' अशी प्रभुचरणी प्रार्थना करून माझ्या लेखणीला आराम देतो.जयहिंद!
                                       प्रकाशभाई मोहाडीकर
                                        संस्थापक
                                      अखिल भारतीय साने गुरूजी
                                       कथामाला,मुंबई   
                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...